डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती
संपादकीय 

अत्त दीप भव

अत्त दीप भव समाजाची धारणा करण्यासाठी धर्म ही संकल्पना अस्तित्वात आली. रानटी टोळ्यांपासून उत्क्रांत होऊ लागलेल्या मानवी समाजात दीर्घकाळ धर्माचे नियम हेच नीतीनियम होते आणि कायदे कानूनही होते. समाज नियमानाचा गाडा धार्मिक नियमांच्या चाकांवर चालू होता. स्वातंत्र्योत्तर काळात त भारताने लोकशाही राज्यव्यवस्थेचा अंगीकार केल्यानंतर या देशाच्या नियमानासाठी घटना बनविण्याची जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येऊन पडली. त्यांनी मोठे कर्तृत्व दाखवून जगातील सर्वोत्कृष्ट संविधानांपैकी एक संविधान भारताला प्रदान केले. आता समाजाला नियंत्रित करणाऱ्या नव्या साधनांचा वापर सुरू झाल्यावर धर्माला आपल्या जीवनात किती आणि कोणत्या उद्दिष्टांसाठी स्थान द्यायचे याचा विचार समाजाने करणे आवश्यक बनले आहे. 
Read More...

Advertisement