शेतकऱ्याच्या विहिरीतून चोरले चक्क पाच टँकर पाणी

मोटर आणि वीज वहन यंत्रणेची मोडतोड

शेतकऱ्याच्या विहिरीतून चोरले चक्क पाच टँकर पाणी

बीड: प्रतिनिधी 

चार दिवस परगावी गेलेल्या शेतकरी कुटुंबाने परतल्यावर पाहिले तर त्यांच्या विहिरीतून चार- पाच टँकर पाणी गायब झालेले दिसले. चोरट्यांनी एवढ्यावरच न थांबता विहिरीवरील मोटर आणि वीज पुरवठा करणाऱ्या डीपीची मोडतोड केल्याचेही आढळून आले. 

साक्षाळ पिंपरी गावातील रंभा आणि त्र्यंबक काशीद हे शेतकरी पती पत्नी चार दिवसांसाठी नातेवाईकांच्या गावी गेले होते. परत आल्यावर पाहिले तर विहिरीतील पाणी तळाला गेलेले! तळाशी गाळयुक्त गढूळ पाणी तेवढे शिल्लक होते. 

काशीद यांची केवळ तीन एकर शेतजमीन आहे. या जागेत त्यांनी फळबाग लावली आहे. मागच्या वर्षी पाणी न मिळाल्यामुळे झाडे सुकून गेली. त्यामुळे काशीद यांनी शेतात विहीर घेतली. यावर्षी उन्हाळ्यातही विहिरीत थोडाफार पाणीसाठा शिल्लक होता. 

हे पण वाचा  मानव एकता दिवस - निष्काम सेवेचा अनुपम संकल्प

मात्र, गावावरून आल्यावर विहिरीने तळ गाठल्याचे पाहून काशीद यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आता या प्रकारात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने पुढाकार घेतला आहे. बीड पोलिसांनी पाणीचोरांना लवकरात लवकर गजाआड करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'भारताकडून चोवीस ते छत्तीस तासात होऊ शकतो हल्ला' 'भारताकडून चोवीस ते छत्तीस तासात होऊ शकतो हल्ला'
इस्लामाबाद: वृत्तसंस्था  दहशतवादाला पोचणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतात बैठकांचे सत्र सुरू असताना भारत आणि कोणतीही घोषणा करण्यापूर्वी हल्ल्याचे वेळापत्रक जाहीर...
पाकिस्तानवरील कारवाईचे सर्वाधिकार सैन्याकडे
'भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे'
शेतकऱ्याच्या विहिरीतून चोरले चक्क पाच टँकर पाणी
'पीएसआय अर्जुन'च्या गाण्याला 'पुष्पा फेम' नकाश अजीज यांचा आवाज
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
'चार दिवसात सुरू होईल भारत पाकिस्तान युद्ध'

Advt