काँग्रेसची 'एकला चलो रे' धोरणाला तिलांजली 

महाविकास आघाडीतूनच निवडणुका लढणार

काँग्रेसची 'एकला चलो रे' धोरणाला तिलांजली 

अनेक वरिष्ठ नेत्यांच्या 'एकला चलो रे' या भूमिकेला मुरड घालत महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीबरोबरच लढविण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

मुंबई: प्रतिनिधी
 
अनेक वरिष्ठ नेत्यांच्या 'एकला चलो रे' या भूमिकेला मुरड घालत महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीबरोबरच लढविण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. 
 
लोकसभेसह सर्व निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्या, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार मांडली आहे. त्यामुळे अनेकदा महाविकास आघाडीत खटके उडण्याचा प्रसंग ही उद्भवला आहे. मात्र, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक काँग्रेस महाविकास आघाडी मार्फतच लढवेल, असा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी रायपूर येथे पार पडलेल्या अधिवेशनात घेतल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
 
स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत मात्र वेगळा निर्णय घेण्यात आला आहे. त्या त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निवडणूक स्वबळावर लढवायची की आघाडीमार्फत लढवायची याबाबतचा निर्णय स्थानिक नेत्यांशी चर्चा करून राज्य पातळीवरचे वरिष्ठ नेते घेतील, असे सांगण्यात आले आहे.

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'आम्ही बहिणींचे लाडके, त्यामुळे तुम्ही झाले दोडके'
'विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय डुप्लिकेट'
आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी एलपीओ हॉलिडेजकडून ‘एक्सक्लुझिव्ह B2B ट्रॅव्हल एजंट्स मीटचं आयोजन!
'कबरीला कायदेशीर संरक्षण, तरी नाही महिमामंडण'
बार्टी, पुणे मार्फत अनुसुचित जातीच्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण
धर्मा प्रॅाडक्शन्स - एव्हीके पिक्चर्स घेऊन येत आहे ‘ये रे ये रे पैसा ३’ 
'लवकरच जाणार मंत्रिमंडळातील सहा सात मंत्र्यांचा बळी'
अजित पवारांनी काँग्रेसला पाडले मोठे खिंडार
श्री विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकर यांची निर्विवाद सत्ता
कुसुमाग्रज स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट