'लाडकी बहीण योजना हा निवडणुकीसाठीच्या बनाव'

राजु शेट्टी यांचा महायुतीवर आरोप.

'लाडकी बहीण योजना हा निवडणुकीसाठीच्या बनाव'

मुंबई: प्रतिनिधी

तत्कालीन महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणि आनंदाचा शिधा अशा योजना आणून शासकीय तिजोरीतून मतदारांना लाच दिली. आहे. या योजना हा निवडणुकीचा बनाव आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणी योजना अमलात आणण्यात आली. या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे रवाना झाले. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जाते.

मात्र, निवडणूक पार पडल्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या पात्रतेची छाननी करण्याची मोहीम घेतली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्रतेची छाननी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार तब्बल पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. 

हे पण वाचा  'कबरीला कायदेशीर संरक्षण, तरी नाही महिमामंडण'

सरकारच्या या कृतीवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. कल्याणकारी योजनांच्या नावाखाली तत्कालीन सरकारने लाडकी बहीण व आनंदाच्या शिधा, अशा योजना जाहीर करून मतदारांना भुरळ घातली आणि सत्ता हस्तगत केल्यानंतर पात्रतेच्या नावाखाली लाभार्थींना मर्यादा घातल्या आहेत. ही मतदारांची फसवणूक आहे, असा आरोप केला जात आहे. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित
  मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 25 टक्के
'भारतातील जनता नाही तर नेतेच जातीयवादी'
'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'
पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही - अशोक सराफ
समाजाचा ढळलेला तोल सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरण आवश्यक!
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का? : हर्षवर्धन सपकाळ
औंध रुग्णालयाच्या आवारात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे

Advt