पाकिस्तानचा जम्मू विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला

भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेने हवेतच नष्ट केली क्षेपणास्त्र

पाकिस्तानचा जम्मू विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक व्यापक होत असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानने जम्मूच्या विमानतळावर क्षेपणास्त्र डागून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने ही क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करून पाकिस्तानचा प्रयत्न विफल ठरवला आहे.

मात्र, पाकिस्तानने थेट विमानतळावर हल्ला करणे म्हणजे उघडपणे युद्ध पुकारणे असल्याचे मत संरक्षण विषयक तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. 

आज संध्याकाळी जम्मू विमानतळाकडे पाकिस्तानकडून आठ क्षेपणास्त्र डागण्यात आली. मात्र एस 400 हवाई सुरक्षा यंत्रणेने ती वाटेतच निकामी करून टाकली आहेत. त्यामुळे जम्मू विमानतळ आणि परिसर पूर्णपणे सुरक्षित आहे. जम्मू कश्मीर प्रमाणेच पाकिस्तानकडून राजस्थानातील जैसलमेर, बारमेर आणि पंजाबच्या सीमावर्ती भागातही ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

पुणे-मुंबई महामार्गावर कार जळून खाक, वडगाव मावळ येथील घटना, पुणे-मुंबई महामार्गावर कार जळून खाक, वडगाव मावळ येथील घटना,
वडगाव मावळ प्रतिनिधी जुना मुंबई पुणे महामार्गावर वडगाव नगरपंचायत हद्दीत पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारने अचानक पेट घेतला.चालकाने प्रसंगावधान राखत कार...
स्वच्छतेचे महत्व ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सुप्रसिद्ध-अभिनेते भरत जाधव यांना ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज
मराठी पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी नंदकुमार सातुर्डेकर
वडूथयेथील पुलाचा 180 वा वाढदिवस साजरा
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन!

Advt