भाजप करणार प्रत्येक जिल्ह्यात 'जनता दरबार'चे आयोजन

पक्ष मुख्यालयात सर्व मंत्री देखील ऐकणार नागरिकांची कैफियत

भाजप करणार प्रत्येक जिल्ह्यात 'जनता दरबार'चे आयोजन

मुंबई: प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार पक्षाच्या वतीने सर्व जिल्ह्यांमध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात सर्व विभागाचे मंत्री देखील नागरिकांची कैफियत ऐकून घेण्यासाठी जनता दरबार घेणार आहेत. 

जनतेचे प्रश्न जाणून त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी भाजपच्या वतीने सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी जनता दरबार चे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना चव्हाण यांनी केली आहे. 

सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि सूचना थेट मंत्र्यांच्या समोर मांडण्याची संधी जनता दरबारच्या निमित्ताने नागरिकांना उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या समस्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी या उपक्रमाचा प्रभावी उपयोग होऊ शकतो, असा पक्ष संघटनेचा विश्वास आहे. 

हे पण वाचा  सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

भाजपचे सर्व मंत्री देखील मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात जनता दरबार चे आयोजन करणार आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या जनता दरबाराने या उपक्रमाला सुरुवात होत आहे. नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश मुख्यालयात पंकजा मुंडे यांचा दुपारी तीन ते साडेचार या वेळात जनता दरबार होणार आहे. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

 चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र
चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण  पिंपरी: प्रतिनिधी 'हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते....
'भाषा शिकण्यावरून वाद हा रिकाम टेकड्यांचा उद्योग'
चाकणसह छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार टेस्लाचे उत्पादन
संग्राम थोपटे लवकरच होणार भाजपमध्ये डेरेदाखल
'... ही मागणी पांडुरंगाकडे करण्याचे कारणच नाही'
'वी द पीपल;'ने जागवल्या बहुजन महानायकांच्या स्मृती
माळशिरस तालुक्यात संपणार पाण्याचा वनवास

Advt