'ठाकरे गटाने युतीसाठी प्रस्ताव द्यावा किंवा थेट ...'

दुधाने पोळले तोंड, आता ताकही फुंकरून पिण्याची व्यक्त केली भूमिका

'ठाकरे गटाने युतीसाठी प्रस्ताव द्यावा किंवा थेट ...'

मुंबई: प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीबाबत शिवसेनेकडून रितसर प्रस्ताव सादर करावा किंवा उद्धव ठाकरे यांनी थेट राज ठाकरे यांच्याशी बोलावे, अशी आपली अट असल्याचे मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

यापूर्वी मनसेने युतीसाठी पुढाकार घेतला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्याची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे दुधाने तोंड पोळल्याचा पूर्वानुभव असल्याने यावेळी ताकही फुंकून पिण्याची काळजी आपण घेत आहोत, अशी स्पष्टोक्ती देशपांडे केली. 

यापूर्वी २०१४ आणि २०१४ या वर्षात झालेल्या निवडणुकीत युती व्हावी अशी मनसेची भूमिका होती. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. उपनेते बाळा नांदगावकर हे मातोश्रीवर दाखल झाले. मात्र, उध्दव ठाकरे यांनी त्यांना भेटही दिली नाही. सुभाष देसाई त्यांना भेटले. त्यांना नांदगावकर यांनी युतीचा प्रस्ताव दिला. आता असा प्रस्ताव शिवसेना ठाकरे गटाने द्यावा. त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे निर्णय घेतील, असे देशपांडे यांनी सांगितले. 

हे पण वाचा  स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक

पडद्यामागे सकारात्मक, पुढाकार मात्र नाही

ठाकरे गट आणि मनसे युतीसाठी ठाकरे गट पडद्यामागे सकारात्मक असल्याचे त्यांचे नेते सांगत आहेत. मात्र, त्यांच्याकडून आजपर्यंत एकही पाऊल उचलले गेले नाही. आम्ही महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. युतीबाबत ठाकरे गटाकडून प्रस्ताव आला तर राज ठाकरे त्यावर विचार करतील. अन्यथा आमची तयारी आहेच, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले. 

राऊत यांच्या विचारपरिवर्तनाचे स्वागत 

यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाची कॅफे म्हणून संभावना केली होती. आता तेच राऊत राज यांचे निवासस्थान हे आमचे दुसरे घर असल्याचे सांगत आहेत. राऊत यांच्या विचारात परिवर्तन होत असेल तर त्याचे स्वागतच आहे, अशा शब्दात देशपांडे यांनी राऊत यांना टोला लगावला. 

तुम्ही एक पाऊल पुढे टाकले तर ... 

ठाकरे गटाला महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताची काळजी असेल तर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा. काल अमित ठाकरे यांनी हेच सांगितले होते. कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नाही. रोज कॅमेरासमोर बोलणाऱ्यानी आपल्या नेत्यांना आमच्या नेत्यांशी संपर्क साधण्यास सांगावे, असे अविनाश जाधव म्हणाले. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, आमचे नेते शंभर पावले पुढे येतील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. 

Tags:

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?' 'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?'
पुणे : प्रतिनिधी भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली? पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली,...
शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट
दिव्यांगाची परवड थांबणार कधी; दिव्यांग व्यक्ती संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव कदम!
नॅशनल पार्क झोपडीवासीयांचा वनवास २५ वर्षे झाली तरी संपेना 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन साजरा  
स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक

Advt