नागपूर दंगल सरकारपुरस्कृत आहे म्हणावे का?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते शरद गोरे यांचा सवाल

नागपूर दंगल सरकारपुरस्कृत आहे म्हणावे का?

पुणे: प्रतिनिधी 

मागील काही काळापासून महायुतीतील काही नेते सातत्याने चिथवणीखोर वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन दंगलीला चिथावणी देणारे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे नागपूर येथे नुकत्याच झालेल्या दंगलीला सरकार पुरस्कृत दंगल म्हणावे काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते डॉ. शरद गोरे यांनी केला आहे. 

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे सरकारचे काम आहे. प्रत्यक्षात सरकारमधील काही मंत्री आणि इतर नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून दंगलीस उत्तेजन देत आहेत आणि सरकार त्याकडे केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे या दंगली सरकार पुरस्कृत आहेत का, असा संशय निर्माण झाला आहे, अशी टीका डॉ. गोरे यांनी केली.

राज्यात अशांततेचे वातावरण म्हणजे विद्यमान सरकारचे अपयश आहे.  त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना सरकार चालवण्याचा नैतिक अधिकार नाही.  त्यांनी सरकार मधून बाहेर पडून सामान्य जनतेस दिलासा द्यावा, असेही डॉ.शरद गोरे म्हणाले. 

हे पण वाचा  ‘सोमेश्वर फाउंडेशन’तर्फे 'पुणे आयडॉल’ स्पर्धा १९ मेपासून 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

पाकिस्तानात हाहा:कार, कराची बेचिराख पाकिस्तानात हाहा:कार, कराची बेचिराख
नवी दिल्ली: प्रतिनिधी  काल संध्याकाळी भारताच्या विविध लष्करी तळांवर हल्ले करून पाकिस्तानने काढलेल्या कुरपतीचे अपेक्षेपेक्षा अधिक वाईट फळ पाकिस्तानला भोगावे...
इस्लामाबादसह पाकिस्तानच्या सात शहरांवर ड्रोन हल्ले
पाकिस्तानचा जम्मू विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला
सुदर्शनचक्राने केले पाक हवाई हल्ल्यापासून भारताचे संरक्षण
लाहोरपाठोपाठ कराचीतही भर दिवसा धमाका
शुभमन गिलच्या गळ्यात पडणार कसोटी कर्णधार पदाची माला
‘सोमेश्वर फाउंडेशन’तर्फे 'पुणे आयडॉल’ स्पर्धा १९ मेपासून 

Advt