'स्वतः कुणाची छेड काढणार नाही, दुसऱ्याने छेड काढली तर...'

भारतीय सैन्याचे अण्णा हजारे यांनी केले कौतुक

'स्वतः कुणाची छेड काढणार नाही, दुसऱ्याने छेड काढली तर...'

शिर्डी: प्रतिनिधी

भारत स्वतः कोणाची छेड काढणार नाही पण भारताची कुणी छेड काढली तर त्याला कधी सोडणार नाही, असे उद्गार काढत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. यापुढे भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याचे धाडस कोणी दाखवणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीर मधील नऊ ठिकाणांचे दहशतवादी तळ उध्वस्त करून घेतला आहे. भारताच्या या कारवाईचे देशभरात समर्थन केले जात आहे. 

लष्कराने एवढी उत्तम कारवाई केली आहे की त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. दहशतवाद्यांनी विनाकारण 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. त्यांना न्याय देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरची कारवाई केली आहे. त्यामुळे या कारवाईच्या विरोधात कोणी काही बोलू शकत नाही, असे अण्णा हजारे यांनी सांगितले. 

हे पण वाचा  जैन मंदिर पाडण्याची कारवाई योग्य असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा

भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ९ ठिकाणी हल्ले करून तीन दशकांपासून सुरू असलेले दहशतवादी अड्डे उध्वस्त केले आहेत. त्यात शेकडो दहशतवादी यमसदनी गेल्याचा दावा करण्यात येत आहे. दहशतवादाच्या विरोधात सर्व देशांनी संघटित होऊन पावले उचलण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

ऍड. उज्ज्वल निकम झाले राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार ऍड. उज्ज्वल निकम झाले राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार
नवी दिल्ली: प्रतिनिधी  नामांकित कायदेतज्ञ ऍड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून निवड केली आहे....
'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पथनाट्य सादर करत केली स्वच्छताविषयक जनजागृती
स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ पत्रकारांनी जागविल्या जुन्या आठवणी
मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तंत्रज्ञानांची मदत
शिरसाट राऊत यांच्यावर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा
या वर्षी ढोल ताशा वादकांवर कायदेशीर कारवाई नाही

Advt