देशमुख अपहरण आणि हत्येची घुलेकडून कबुली

जयराम घाटे आणि महेश केदार यांनीही दिली हत्येची कबुली

देशमुख अपहरण आणि हत्येची घुलेकडून कबुली

बीड: प्रतिनिधी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या केल्याची कबुली या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी आणि सरकारी वकील उज्वल निकम यांनी टोळीचा प्रमुख म्हणून वर्णन केलेल्या सुदर्शन घुले याने दिली आहे. त्याच्याबरोबरच जयराम घाटे आणि महेश केदार या आरोपींनी देखील अपहरण आणि हत्तीची कबुली दिली आहे. या कबुलीजबाबामुळे संतोष देशमुख यांची हत्या हा मोठ्या कटाचा भाग आहे, हे स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. 

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणी संतोष देशमुख आणि आरोपी यांच्यामध्ये वितुष्ट आले होते. या प्रकरणातूनच देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी आठ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहे. 

या खटल्याची पहिली सुनावणी काल केज न्यायालयात पार पडली. या वेळी सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोप ठेवण्याची तयारी दर्शवली. मात्र, आरोपपत्रांसह अन्य आवश्यक कागदपत्रे न मिळाल्यामुळे आरोप निश्चित न करण्याची विनंती आरोपींच्या वकिलांनी केली. या गुन्ह्यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्या मार्गदर्शनाखाली आणि सुदर्शन घुले याच्या नेतृत्वाखाली टोळीने काम केल्याचा दावा सरकारी वकील निकम यांनी न्यायालयात केला. 

हे पण वाचा  'योग्य, अयोग्याच्या पलिकडे जाऊन सामोपचाराने...'

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

ईदची नको, हवी न्यायाची भेट! ईदची नको, हवी न्यायाची भेट!
स्थित्यंतर / राही भिडे हिंदू, इस्लामसह अन्य धर्मातही असे मानले जाते की इतरांना, विशेषतः दुर्बलांना मदत केल्याने पुण्य मिळते. त्यामुळे...
नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील 'तुझे आहे तुजपाशी'चा  रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर
लष्करी अधिकाऱ्याकडून लष्करी अधिकाऱ्याचीच फसवणूक
ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शिंदे गटात डेरेदाखल
खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब
महाराष्ट्र बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण

Advt