लोकलमधून पडून आठ प्रवाशांचा मृत्यू

दिवा मुंब्रा दरम्यान झाला अपघात, अनेक जण जखमी

लोकलमधून पडून आठ प्रवाशांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी 

दिवा मुंब्रा दरम्यान लोकलच्या दारात उभे राहिलेले प्रवासी शेजारून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासून खाली पडले आणि आठ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी असून त्यांना ठाणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर रेल्वे बोर्डाने आपोआप बंद होणाऱ्या दारांच्या लोकल. गाड्या आणण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दु;:ख व्यक्त केले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. 

मुंबईकडे जाणाऱ्या लोकलला अतोनात गर्दी असल्यामुळे प्रवासी लोकलच्या दाराबाहेर लटकत होते. शेजारून आलेल्या एक्सप्रेसला घासून दारात लटकणारे प्रवासी खाली पडले. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला. 

आपल्याकडे नगर नियोजन नावाची संकल्पनाच अस्तित्वात नाही. रस्ते नाहीत, पार्किंग नाही, रस्त्यांवर वारंवार कोंडी होत असते. मुंबई, पुणे, आणि अशा सर्व शहरांमध्ये हीच अवस्था आहे. परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. मेट्रो सारख्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मात्र त्याने प्रश्न सुटणार नाही, अशा शब्दात ठाकरे यांनी या अपघाताबद्दल संताप व्यक्त केला. 

हे पण वाचा  राज्यात अनुसूचित जातींसाठी स्वतंत्र आयोगाची होणार स्थापना

About The Author

Advertisement

Latest News

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी विद्यार्थी एल्गार परिषद मुंबईत! विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी विद्यार्थी एल्गार परिषद मुंबईत!
मुंबई / रमेश औताडे  ओबीसी व भटके-विमुक्त विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात आणि शासनाच्या दुर्लक्षित धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी सोमवार, १० जून रोजी मुंबईतील...
यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी आवश्यक: डॉ भारतभूषण जोशी 
'देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या जनाधाराची राखावी बूज'
अनोखा अनुभव देणाऱ्या 'समसारा' चित्रपटाची उत्कंठा शिगेला
आरोपीच्या अटकेसाठी सामाजिक संघटना एकवटल्या!
भारताच्या उंबरठ्यावरून वारकरी निघाले विठोबाच्या भेटीला 
" मी भारतीय " मोफत पहा  – मुंबई मराठी पत्रकार संघात !

Advt