तर त्या भागातील शेतकरी आत्महत्या कमी होतात
मुंबई / रमेश औताडे
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका म्हणजे शेतकऱ्यांच्या व त्याच्या शेतीच्या कल्याणकारी भविष्याचा वेध घेणाऱ्या निवडणुका असतात. शेतमालाला योग्य बाजार भाव व शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशाचा पारदर्शक कारभार पाहणारे कमिटी सदस्य असतील तर त्या भागातील शेतकरी आत्महत्या संख्या वाढत नाहीत. याचा प्रत्यय यवतमाळ जिल्यातील पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दिसून आला आहे.
यवतमाळ जिल्यातील पांढरकवड्यातील " व्हिसल ब्लोअर " भट्टाचाराची यंत्रणेचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत डालुरामजी बोरेले यांनी सरकारी बांबूचा गैरव्यवहार आणि काही मनमानी करणाऱ्या दलालांचा कारभार उघडा पडल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला असल्याने शेतकरी वर्ग आनंदी झाला आहे.
या पैशांची उधळपट्टी, दारू, सट्टेबाजी करत एका मतासाठी ६४ हजार रुपये तर काही ठिकाणी २० हजार ते ३५ हजार रुपयांचे सट्टा बाजार दर होते. असे असताना भाजपला एकही उमेदवार जिंकता आला नाही. विजयानंतर शहरात कडक पोलीस बंदोबस्तात भव्य रॅली काढण्यात आली. वासुदेव राठोड, अशोक राय (सम्राट), अक्षय पिपलवा, उमेश बोरेले, धरमसिंग राठोड आणि बोरेले मित्रपरिवाराने मोठे योगदान दिले. शहरात ज्या वेळी निवडणूक झाली त्यावेळी अनेक व्यापारी आनंदी होते. एका व्यापाऱ्याने तर रजनीकांत यांची गुळ तुला केली तर गुलालाचा उधळणीने रस्ते गुलालमय झाले होते.
000