शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुराव्यात - जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक

शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुराव्यात - जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक

सातारा : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बाजार समित्या असून शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुराव्यात, असे आवाहन सातारचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक, समित्यांचे सचिव यांच्यासाठी सातारा येथे पणन विषयक एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन सातारा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पणनचे उप सरव्यवस्थापक. डॉ सुभाष घुले, सहाय्यक निबंधक संजय जाधव, डीएमआय अच्चुत सुरवसे, कृषि अधिकारी सिद्धेश्वर मोकळे, पणन मंडळाचे अधिकारी अमोल भोंग, महेश जगताप, प्रसाद भुजबळ, शशिकांत भरणे व सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे पदाधिकारी, सचिव उपस्थित होते.

बाजार समित्यांसाठी शेतकरी हा महत्वाचा घटक असल्याचे सांगून जिल्हा उपनिबंधक श्री. सुद्रीक म्हणाले, आजच्या बदलत्या काळात बाजार समितीने पायाभुत सुविधा अधिक बळकट करणे गरजेचे कराव्यात. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करावे, असे आवाहन केले.

कृषि पणन मंडळाचे कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले यांनी आयोजित कार्यशाळेची प्रस्तावना करुन पणन मंडळाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. बाजार समितीमध्ये शेतक-यांसाठी ई वाचनालय सुरु करणेबाबत आवाहन केले. सातारा जिल्ह्यातील शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतक-यांना उपयुक्त ठरतील अशा सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व शेतक-यांनी उत्पादित केलेल्या शेतमालास जास्तीत जास्त भाव मिळण्यासाठी कामकाज करावे, असे महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी सूचित केले.

हे पण वाचा  जय भवानी, जय शिवाजी चा नारा देत माणमधील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकार्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

सहायक निबंधक संजय जाधव यांनी पणन विभागाचे विविध कायदे व निधीचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. कृषि अधिकारी सिध्देश्वर मोकळे यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणा-या सर्व योजनांची माहिती दिली. केंद्रशासनाच्या डीएमआयचे अधिकारी अच्युत सुरवसे यांनी डीएमआयच्या बाजार समिती व शेतकरी यांचेसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी राज्यस्तरीय रॅंकींगमध्ये कोल्हापूर विभागात अनुक्रमे दोन व तीन क्रमांक आल्याबद्दल फलटण व लोणंद बाजार समितीचे सभापती, उप सभापती, पदाधिकारी. व सचिव यांचा सत्कार करण्यात आला. अमोल भोंग यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

000000

Tags:

Advertisement

Latest News

कोरेगाव-वाठार रस्ता झाला खड्ड्याचा कोरेगाव-वाठार रस्ता झाला खड्ड्याचा
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजेना कोरेगाव : खंडाळा ते शिरोळ या सुमारे 140 किलोमीटर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू...
तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत परप्रांतीय वाढले
साताऱ्यात शिवसेनेच्या वतीने विमान अपघातग्रस्तांना भावपूर्ण श्रद्धांजली
म्हसवे जिल्हा परिषद गटात सबकुछ 'मानकुमरे'
रायसोनी कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागालाएनबीए मान्यता!
शास्त्रीय संगीत-नृत्य, गायनाने सजला 'गंगाधर स्वरोत्सव युव-रंग'
३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घेण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

Advt