Heavy Rains | उंब्रज परिसरात ९० वीटभट्टींचे तीन कोटींवर नुकसान

अस्मानी संकटानंतर वीटभट्टींचे प्रोडक्शन थांबले

Heavy Rains | उंब्रज परिसरात ९० वीटभट्टींचे तीन कोटींवर नुकसान

उंब्रज : मे महिन्यात सुमारे दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने उंब्रज विभागातील वीट भट्टी व्यवसायांना मटका फटका बसला असून ९० वीट भक्तांचे सुमारे तीन कोटींवर नुकसान झाले आहे यामुळे वीट भट्टी चालक-मालक हाताश झाला असून नुकसान भरून कसे काढायचे हा प्रश्न वीट व्यावसायिकांसमोर उभा झाला आहे. पावसाने भाजण्यासाठी रचलेल्या भट्यांचे अतोनात नुकसान झाले असून नवीन वीट तयार करण्याचे काम थांबल्यानेही कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. 

अस्मानी संकटनाने अनेक वीट व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले. वीटभट्टी व्यवसायात अनेक नवीन व्यावसायिक बँकाना घरे, शेती तारण ठेवून लाखोंचे कर्ज घेवून या व्यवसायात उतरले आहेत पंरतु पावसाने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून नेला आहे. उंब्रज, वडोली भिकेश्वर, कोर्टी, भोसलेवाडी, शिवडे हद्दीत वीटभट्टींचे कोट्यावधींचे नुकसान आहे. वीट व्यावसायिक विजय जाधव यांचे १५ लाख, हरिश्चंद्र कुराडे, १० लाख, धनाजी बागल, ८ लाख, विनायक रामचंद्र जाधव, १५ लाख, सजीन त्रिंबक माने, १० लाख, सचीन बाळासाहेब कदम १५ लाख, सचीन कृष्णत साळुंखे ७ लाख, गुंडीराव राजबा  केदार ८ लाख, अरविंद थोरात २० लाख, बाबासो जाधव १० लाख तसेच अर्जुन राठोड, नानासो चव्हाण अशा ९० हून  वीट व्यावसायिकांचे प्रत्येकी लाखोंच्या घरात नुकसान आहे. महसूल प्रशासनाने या अस्मानी संकटातून वीट व्यवसाय वाचवण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करुन वीट व्यावसायिकांना भरपाई देण्याची मागणी होत आहे. 

२०२२ ते २४ या आर्थिक वर्षात वीटेचे दर मोठ्या प्रमाणावर ढासळले आहेत. सध्या शासनाने घरकुलची कामे काढल्याने कुठेतरी वीटेची मागणी होत होती तोच अस्मानी संकटाने व्यवसायाला ब्रेक लागला आहे. वीट तयार करण्यासाठी लागणारी यंत्रणा, गारेकरी, कामगारची समस्या प्रचंड मोठी आहे. त्यातून मार्ग काढून वीटभट्टी मालकांचा संघर्ष सुरू आहे. मे महिन्यात एखाददुसरा वळीचा पाऊस होतो त्यामुळे वीट व्यावसायिक ताडपत्रीने कच्चा माल व भाजण्यापुर्वी तयार केलेली वीट झाकून ठेवतात पंरतु प्रथमच मे महिन्यात सलग दहाबारा दिवस झालेल्या पावसाने प्रयत्न करूनही नुकसान टाळता आले नाही. 

वडोली भिकेश्वर, उंब्रज,कोर्टी, भोसलेवाडी, शिवडे, भवानवाडी हद्दीत पेटवलेल्या भट्ट्या सुधा पावसाने ढासळल्या आहेत, भट्ट्यामध्ये पाणी गेल्याने, प्रचंड माल खराब झाला आहे. तसेच अवकाळी पावसाने नव्याने होणाऱ्या वीट प्रोडक्शनचे सुमारे  १० कोटींवर नुकसान झाल्याचे वीटभट्टी असोसिएशनचे अध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले. वीट तयार करण्यासाठी थापलेला माल, बग्यास, लेबर मजूरी पाण्यात गेल्याचे त्यांनी सांगितले. 

हे पण वाचा  प्रसंगावधान राखत जैनकवाडी येथे सांडव्यातील पाण्याचा अडथळा दूर करुन मार्ग केला मोकळा

शासनाने वीट व्यवसाय वाचवण्याची गरज
मजबूत घरे, इमारतींच्या बांधण्यासाठी मातीची लाल वीट अत्यंत महत्त्वाची आहे. पंरतु वीट व्यवसायाला दिवसेंदिवस नुकसानीचा सामना करावा लागतो. अनेक बेरोजगार युवक घरे, शेतजमीन बॅकेकडे तारण ठेवून लाखोंचे कर्ज घेतात पंरतु या व्यवसायाला गेल्या काही वर्षांत ग्रहन लागले असून तीनचार वर्षांचा माल वीट व्यावसायिकांकडे पडून आहे. त्यातच मे महिन्यात यावर्षी पावसाने धुतल्याने एका वीटभट्टीवर किमान १० ते १५ लाखांचे नुकसान झाले आहे. या संकटातून बाहेर पडून पुन्हा उभे राहण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी वीट व्यावसायिक विजय जाधव, हरिश्चंद्र कुराडे, धनाजी बागल, राजीव रावळ यांनी दिल्या.

000

About The Author

Advertisement

Latest News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुशल प्रशासक व पराक्रमी राज्यकर्ती म्हणून परिचित असलेल्या आणि इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा...
'हिंदी बनली मुंबईची बोलीभाषा, तीच आमची लाडकी बहीण'
'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन'
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मुंबई युवक अध्यक्षपदी संतोष कदम!
निलेश चव्हाण याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी
भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी...
गिरे तो भी टांग उपर, पाक फील्ड मार्शलनी पुन्हा ओकली गरळ

Advt