तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत परप्रांतीय वाढले

तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत परप्रांतीय वाढले

व्यसनाधीनता व असुरक्षितत वातावरण; स्थानिकांना त्रास

उंब्रज : कराड तालुक्यातील तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वावरणाऱ्या परप्रांतीय लोकांचा संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून त्याचा त्रास स्थानिकांना होवू लागला आहे. परप्रांतीयांचा वावर, गुन्हेगारी व विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश व काही इतर राज्यातील लोक तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिनधास्त वास्तव्य करत आहेत. त्याच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने गंभीर स्थिती आहे.

कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीत रोजगाराच्या नावाखाली उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश व काही इतर राज्यातून कामगारांचे लोंढेच्या लोढे दाखल झाले आहेत. काही उद्योजक कमी हजरीत कामगार मिळत असल्याने या परप्रांतीय लोकांना कामावर ठेवत आहेत. मात्र या परप्रांतीय कामगारांची कंपनी व्यवस्थापनाने वर्तणूक तपासणी केली नसते तसेच त्यांच्या राहण्या जेवणाची सोय केली नसल्याने तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तासवडे, तळबीड, वराडे, बेलवडे हवेली, शिरवडे, वहागाव या गावांमध्ये परप्रांतीय भाड्याने खोल्या घेवून प्रसंगी मिळेल त्या जागेत राहतात. अनेकजण पैशाच्या आमिषाने या परप्रांतीय लोकांना थारा देत आहेत. परंतू या लोकांची कोणतीही माहिती न घेतल्याने असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. यातील बहुतांश परप्रांतीय ना ना प्रकारची व्यसने करतात. एका रुममध्ये दाटीवाटीने राहतात. जिथे राहतात तिथे मद्यपान, तंबाखू, गुटखा,गांज्या सिगारेट, ओढत बसणे, मोठमोठ्याने फोनवर बोलणे, रात्री अपरात्री येजा करणे असे प्रकार सर्रास सुरू आहे. त्याचा त्रास स्थानिकांना होत आहे. ज्या रुम मालकाने परप्रांतीय ठेवले आहेत तोही त्यांची पुरेपूर माहिती न घेता व शेजारील रहिवाशांना होणाऱ्या त्रासाची तमा न बाळगता आपल्याला भाड्याचे पैसे मिळाले पाहिजेत यासाठी वाटेल ते करत आहे यामुळे वादविवादात वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षांत तासवडे एमआयडीसीत परप्रांतीय कामगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने स्थानिक युवक बेरोजगार झाला आहे. स्थानिकांना कामाचा योग्य मोबदला मिळत नाही या उलट परप्रांतीय कमी हजेरीत काम करतो. त्यामुळे अनेक उद्योजकांचा वेळ काढू पणा हा एमआयडीसी व आजूबाजूच्या गावांमध्ये असुरक्षित वातावरण निर्माण होण्यास प्रोत्साहन देत आहे. तासवडे एमआयडीसीत स्थानिक महिला रोजगाराच्या शोधात असतात मात्र परप्रांतीयांच्या मोठ्या वावर असल्याने त्यांना काम मिळत नाही. मिळाले तर त्या काम करण्यास धजवत नाहीत किंवा कुटुंबातून परवानगी मिळत नाही.अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनानेही याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.

हे पण वाचा  घोडेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात महिलेचा विनयभंग!

उद्योजक बंगाल्यात, परप्रांतीय गावात

एमआयडीसीतील काम संपल्यानंतर मालक वर्ग त्यांच्या अलिशान गाडीतून कराड, सातारा सारख्या शहरामध्ये असलेल्या बंगल्याकडे निघून जातो. मात्र परप्रांतीय कामगार वर्ग गावांमध्ये बिनदिक्कतपणे फिरत असतो. त्याच्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे सध्याचे चित्र आहे. काही खोली मालक भर वस्तीत परप्रांतीय कामगारांना राहण्यासाठी रुम देतात मात्र या परप्रांतीय लोकांच्या वावराने स्थानिक मुलीबाळीना मनमोकळ्या पणाने वावरता येत नसल्याची अनेकांची खंत आहे.

पोलीस पाटील व स्थानिक पोलीस अनभिज्ञ...

गावात एखादी घटना घडल्यांतर पोलीस पाटील व स्थानिक पोलीसांना जाग येते व ते परप्रांतीयाचा शोध घेऊ लागतात मात्र तो पर्यंत वेळ गेलेली असते. अशा अनेक घटना घडल्या आहेत. अलिकडे पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ झाली आहे मात्र कामाच्या जबाबदारीत वाढ झाली नसल्याने गावात नेमके काय चालले आहे हे पोलीस पाटील यांना समजून येत नाही. गावात किती परप्रांतीय राहतात, ते कोणत्या राज्यातील आहेत. केव्हा पासून राहतात. त्यांची वर्तणूक कशी आहे याचा कोणताही माहिती नसल्याने अनेक परप्रांतीय उचापत्या करुन रातोरात गायब होतात त्यांचा थांगपत्ता पोलीस प्रशासनालाही लागत नाही.

उंब्रज शहरात सुळसुळाट

सध्या उंब्रज शहरात परप्रांतीय लोकांचा सुळसुळाट असून उंब्रज पोलीस ठाण्यातही त्यांचे रेकार्ड नाही. कप, बादली, चटई, कपडे घेवून परप्रांतीय गावोगावी फिरतात. आईस्क्रीम खारी टोस, पाणीपुरी, चायनिज पासून इतर खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय या परप्रांतीय लोकांनी ताब्यात घेतले आहेत. अन्न औषध प्रशासनाने कधीही या खाद्य पदार्थांची तपासणी केली नसल्याने नागरीकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. शहरातील वेगवेगळ्या गल्लांमध्ये दहावीस जण एकाएका खोलीत राहतात. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

 

00000000000000

Tags:

Advertisement

Latest News

Advt