कोरेगाव-वाठार रस्ता झाला खड्ड्याचा
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजेना
कोरेगाव : खंडाळा ते शिरोळ या सुमारे 140 किलोमीटर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून या कामाचे निमित्ताने संबंधित ठेकेदाराने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कोरेगाव ते वाठार रस्ता नुसताच खोदून ठेवला आहे. रस्त्यावर पाच-पाच, दहा-दहा फुटाचे खड्डे खोदल्याने रस्त्यात खड्डे की रस्त्यात खड्डा हेच लोकांना समजत नसल्याने दररोज छोटे-मोठे शेकडो अपघात होत आहेत. चार दिवसांपूर्वी दूचाकी स्लिप झाल्याने गरोदर महिला गाडीवरून पडली सुदैवाने ही महिला बचावली. संबंधित ठेकेदाराला वाहनधारक दररोज शिव्यांची लाखोली वाहत प्रवास करत आहेत. दरम्यान पीपल्स रिपब्लिकन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांनी तर तुम्ही दहा हजार कोटी रुपये कमवा परंतु सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळू नका. पावसाळा सुरू होण्यापूर्वी काही उपाययोजना करा अन्यथा आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबंधित ठेकेदार व सरकाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे.
याबाबत बोलताना रमेश उबाळे म्हणाले, दळण-वळनणासाठी रस्ते डेव्हलप होणे ही काळाची गरज आहे. पुणे, खंडाळा, शिरवळ, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी सक्षम आशा एम.आय.डी.सी. आहेत प्रस्तुत रस्ता प्रमुख शहराणा जोडणारा आहे 140 किलोमीटरचा हा रस्ता आहे. वास्तविक हा रस्ता संबंधित ठेकेदाराने आपल्याकडे जेवढी यंत्रणा आहे. त्या प्रमाणात रस्त्याचे काम करणे आवश्यक आहे. परंतु तसे न करता वाठार ते कोरेगाव हा सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटरचा रस्ता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उखरून ठेवला आहे नुसता उखरून नाही तर पाच - पाच, दहा- दहा फूट रस्ता खांदला आहे त्यामुळे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हेच लोकांना समजत नाही. पाऊस पडल्यावर खड्डडे भरल्याने खड्ड्यामध्ये गाडी घालावी की नको हा प्रश्न चालकाला पडत आहे. दूचाकी नव्हे तर चार चाकी वाहनही चालवणे या रस्त्यावरून मुश्किल होत आहे. वास्तविक रस्त्यावर दिशादर्शक फलक लावलेतरी चालकाला वाहन चालविणे थोडे सुलभ होईल. अन्यथा पावसळ्यापूर्वी किमान खड्डे भरून वाहने रस्त्यावरून चालवीता येतील एवढीतरी ठेकेदाराने सोय केली पाहिजे अशी आमची माफक मागणी आहे.
चार दिवसांपूर्वी पती आपल्या गरोदर पत्नीला दुचाकिवरून दवाखान्यात घेऊन जात असताना वाहन स्लिप झाल्याने गरोदर महिला पडली परंतु सुदैवाने ही बचावली. दररोज रस्त्यावर छोट्या-मोठ्या आपघाताची मालिका सुरूच आहे. सातारा-पंढरपूर रस्त्यावरून प्रवास करत असताना आत्तापर्यंत 64 लोकां मेघा इंजिनीरिंगमुळे प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये कुटूंबप्रमुखांची संख्या अधिक आहे त्यामुळे अनेक कुटूंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत श्रीमती माणूसाचा आपघात झाल्यावर तो कुठेही चांगल्या दवाखान्यात उपचार घेऊ शकतो परंतु गरीब माणसाचा आपघात झाल्यानतंर त्यांच्या कुटूंबियांवर आणीबाणी येते. सिटी स्कॅन करण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उपलब्ध नसतात. सरकारी दवाखान्यातुन तर येथे तुमचा उपचार होत नाही म्हणुन हकलून दिले जाते. अखेर रानात काम करुन नवऱ्याला जगविण्याची वेळ येते. म्हणुन तुम्ही रस्त्याच्या कामात दहा हजार कोटी रुपये कमवा परंतु समान्य, गरीब लोकांच्या जीवाशी खेळू नका अन्यथा आम्हाला तुमच्या विरोधात आंदोलन करावे लागेल. असा इशाराही रमेश उबाळे यांनी दिला.
पाऊस पडल्यावर रस्त्यावर होतो राडा-रोडा
कोरेगाव- वाठार रस्ता पुर्ण उकरला आहे. त्यामुळे रस्त्यावर मातीचे ढीगारे पडले आहेत. पाऊस पडल्यावर या मातीचे चिखलात रूपांतर होत असल्याने मोठया प्रमाणात राडा-रोडा झाल्याने रस्त्यावरून चार चाकी नव्हे तर दूचाकी वाहन चालवीणे जिकिरीच होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने पावसाळ्याच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात तरी काही उपाय योजना करुन दिल्या पाहिजेत अशी मागणीही रमेश उबाळे यांनी केली.
000000000000000000000000