'काश्मीरला अजूनही भोवत आहेत पं. नेहरू यांच्या दोन चुका'

अमित शहा यांची टीका, काश्मीर आरक्षण सुधारित विधेयक लोकसभेत संमत

'काश्मीरला अजूनही भोवत आहेत पं. नेहरू यांच्या दोन चुका'

नवी दिल्ली: प्रतिनिधी

जम्मू काश्मीरमधील आरक्षित मतदारसंघाबाबत दोन सुधारणा विधेयके लोकसभेत मंजूर करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत बोलताना, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या दोन चुका काश्मीरला अजूनही भोवत आहेत, अशी टीका गृहमंत्री अमित शहा यांनी केली. 

जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत स्थलांतरित काश्मिरी पंडितांसाठी एक पुरुष व एक महिला आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांसाठी एक अशा तीन जागा आरक्षित ठेवण्याचे सुधारित विधेयक सरकारच्या वतीने लोकसभेत मांडण्यात आले. हे विधेयक बहुमताने संमतही करण्यात आले. 

पाकिस्तानशी सुरू असलेल्या युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याची विजयाकडे वाटचाल सुरू असताना पंडित नेहरू यांनी युद्धविराम मान्य करून एक चूक केली. ती चूक जर टळली असती तर पाकव्याप्त काश्मीर आज भारताच्या ताब्यात असते, असा दावा शहा यांनी यावेळी केला. त्याचप्रमाणे काश्मीरचा अंतर्गत प्रश्न संयुक्त राष्ट्र संघापर्यंत नेण्याची दुसरी गंभीर चूकही पंडित नेहरू यांनी केली, असेही ते म्हणाले. 

हे पण वाचा  'तालकटोरा मैदानात उभारावे मराठा वीरांचे पुतळे'

नव्याने संमत झालेल्या सुधारित विधेयकांमुळे आतापर्यंत ज्यांच्यावर अन्याय झाला त्या काश्मिरी पंडित आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांवरील अन्याय दूर होण्यास मदत होणार आहे, असा दावाही शहा यांनी केला. 

काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये आर्थिक विकास मूळ धरू लागला आहे, असा दावा करतानाच शहा यांनी मनोरंजन क्षेत्राच्या वाढीचे उदाहरण दिले. कलम 370 रद्द केल्यानंतर सन 2021 मध्ये काश्मीरमध्ये पहिले मल्टिप्लेक्स चित्रपटगृह उभारण्यात आले आणि सध्या किमान 100 नवीन चित्रपटगृह उभारण्यासाठी वित्त सहाय्याचे अर्ज बँकांमध्ये आहेत. त्याचप्रमाणे या कालावधी हिंसाचाराला आळा बसल्यामुळे तब्बल 100 हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण काश्मीरमध्ये पार पडल्याचेही त्यांनी नमूद केले. 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

नागपूर दंगल सरकारपुरस्कृत आहे म्हणावे का?
BARTI news | वेबसाईट द्वारे महाडचा सत्याग्रह आता मराठीसह कन्नड भाषेतही!
'ऊसतोडणी कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा'
प्रशांत दामले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर
विरोधी गटाचे मताधिक्य रोखण्याचे सत्ताधारी गटाकडे मोठे आव्हान!
निवडणूक सह्याद्री साखर कारखान्याची पण पेरणी मात्र नगरपरिषद निवडणुकीची!
'मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे'
'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक'
आजपासून माथेरान पर्यटकांसाठी बेमुदत बंद
पीएचडी मार्गदर्शकांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा