'मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडणार'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

'मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडणार'

नागपूर:: प्रतिनिधी

ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, बाबाजानी दुर्राणी, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मेंढेगिरी समितीच्या समन्यायी तत्वानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यात येत असते. परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार पाणी सोडण्याचा कालावधी पुढे-मागे होत असतो.  न्यायालयातही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शासन ठाम भूमिका घेईल. पुढील काळात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, ती पिण्याच्या पाण्याचे नियोजन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

हे पण वाचा  Vadgaon Maval | वाहनांच्या धडकेत फळ विक्रेत्याचा मृत्यू; रस्ता ओलांडताना महामार्गावर कान्हे फाटा येथे अपघात

About The Author

Advertisement

Latest News

वळणाचे बळी! .. वळणाचे बळी! ..
मुंबई उपनगरीय रेल्वेचे अपघात नवीन नाहीत. हजारो प्रवाशांचा बळी जाऊनही रेल्वे प्रशासनाला शहाणपण सुचत नाही. पूर्वीचेच प्रयोग पुन्हा पुन्हा केले...
महत्त्वाकांक्षेचा चिराग!
रविवारच्या सुट्टीसाठी १३५ वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडेंना भारतरत्न मिळावा!
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी विद्यार्थी एल्गार परिषद मुंबईत!
यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी आवश्यक: डॉ भारतभूषण जोशी 
'देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या जनाधाराची राखावी बूज'
अनोखा अनुभव देणाऱ्या 'समसारा' चित्रपटाची उत्कंठा शिगेला

Advt