'मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडणार'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

'मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडणार'

नागपूर:: प्रतिनिधी

ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, बाबाजानी दुर्राणी, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मेंढेगिरी समितीच्या समन्यायी तत्वानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यात येत असते. परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार पाणी सोडण्याचा कालावधी पुढे-मागे होत असतो.  न्यायालयातही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शासन ठाम भूमिका घेईल. पुढील काळात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, ती पिण्याच्या पाण्याचे नियोजन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

हे पण वाचा  अधिकाधिक असंघटित कामगारांना ई श्रमिक कार्ड देणार: चॅटर्जी

About The Author

Advertisement

Latest News

सावित्रीबाई फुले आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन सावित्रीबाई फुले आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे  ~  डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया या  शिक्षण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या  संस्थेच्या सावित्रीबाई फुले...
Almatti Dam | अलमट्टी धरणाची उंची कुठल्याही परिस्थितीत वाढ होऊ देणार नाही; सरकारने कोर्टाची पायरी चढली पाहिजे!
सर्वोच्च न्यायालय विरुद्ध राष्ट्रपती!
वडगाव नगरपंचायत स्वागत कमानीवरील नाव बेकायदेशीर असल्याची नागरीकांची मागणी
पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल्ल यांची नियुक्ती
लाडकी बहिण योजनेचा श्रेयवाद महायुतीत सुरूच?
अधिकाधिक असंघटित कामगारांना ई श्रमिक कार्ड देणार: चॅटर्जी

Advt