- राज्य
- Vadgaon Maval | वाहनांच्या धडकेत फळ विक्रेत्याचा मृत्यू; रस्ता ओलांडताना महामार्गावर कान्हे फाटा येथ...
Vadgaon Maval | वाहनांच्या धडकेत फळ विक्रेत्याचा मृत्यू; रस्ता ओलांडताना महामार्गावर कान्हे फाटा येथे अपघात
मावळ परिसरात हळहळ व्यक्त
मावळ तालुक्यातील कान्हे फाटा हद्दीमध्ये पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या ५१ वर्षीय फळ विक्रेत्याचा डंपरच्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
वडगाव मावळ / प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील कान्हे फाटा हद्दीमध्ये पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या ५१ वर्षीय फळ विक्रेत्याचा डंपरच्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
अशोक गणपत लालगुडे (वय ५१, रा. इकोव्हॅली सोसायटी, कान्हे, ता. मावळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या निधनाने मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या फळ विक्रेत्याचा पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ही दुर्घटना मावळ तालुक्यातील कान्हे गावाच्या हद्दीत घडली.
अशोक गणपत लालगुडे (वय ५१, रा. इकोव्हॅली सोसायटी, कान्हे, ता. मावळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या निधनाने मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी संदीप चंद्रकांत सातकर यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार १ जून रोजी दुपारी सुमारास अशोक लालगुडे हे राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगात असलेल्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अशोक लालगुडे हे कान्हे येथे फळ विक्री आणि टेम्पो मालवाहतुकीचा व्यवसाय करत होते काही दिवसांपूर्वीच त्यांच्या एका मुलीचा विवाह पार पडला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, समीक्षा आणि आरोही या दोन मुली असा परिवार आहे. लालगुडे यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
उपाययोजना नाहीत, म्हणून अपघात पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने अपघात होत असल्याचे सांगण्यात येत आहे. वेळीच पर्यायी व्यवस्था न केल्यास भविष्यातही रस्ता ओलांडताना अशा प्रकारचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
About The Author
