मुंबई पुण्यासह कोकण किनारपट्टीवर 'हाय अलर्ट'

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क

मुंबई पुण्यासह कोकण किनारपट्टीवर 'हाय अलर्ट'

मुंबई: प्रतिनिधी

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे या शहरांसह कोकण किनारपट्टीवर 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. 

महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह अनेक पर्यटन स्थळांवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागांवरही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. किनारपट्टीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी व प्रवाशांची चौकशी करण्यात येत आहे.

गर्दीची ठिकाणे, महत्त्वाच्या इमारती व संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि परिमंडळाचे उपायुक्त यांना अधिक सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी देखील संशयास्पद व्यक्ती, हालचाली अथवा वस्तू निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

हे पण वाचा   पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल्ल यांची नियुक्ती

About The Author

Advertisement

Latest News

रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर भारत जिंदाबाद यात्रा चे आयोजन रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर भारत जिंदाबाद यात्रा चे आयोजन
मुंबई / रमेश औताडे      प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला आणि दहशतवा‌द्यांना चांगला धडा शिकवला याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारी दहशतवादाला...
शहराचा सिमेंट काँक्रिटचा विकास होत असताना मंदिरासमोरील गोमाता पालिकेच्या कोंडवाड्यात
पुण्यात विविध ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी
'राहुल व सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यातून मिळवले 142 कोटी'
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या सुनेने केली आत्महत्या
मोहम्मद युनूस यांची लवकरच हकालपट्टी?
मधमाशा पालन, संवर्धनासाठी जनजागृती हवी:डॉ.सावंत

Advt