चोराच्या उलट्या बोंबा, घाबरलेल्या पाकिस्तानचा कांगावा

दहशतवादी तळांवर नव्हे तर नागरी भागात हल्ले केल्याचा दावा

चोराच्या उलट्या बोंबा, घाबरलेल्या पाकिस्तानचा कांगावा

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

भारताने हल्ला करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि नऊ नव्हे तर सहा ठिकाणी हल्ला केला. हे हल्ले झालेल्या ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ नव्हते तर नागरी भागात हे हल्ले झाले आहेत, असा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. 

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ले करून केवळ 25 मिनिटात दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त केले आहेत. पहलगाम हल्ल्यातील मृत व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी हे हल्ले केल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

मात्र, पाकिस्तानने भारताकडून झालेले हल्ले नागरी भागात झाल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यामध्ये आमचे 26 नागरिक मरण पावले असून 46 जण जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानन केला आहे. कहर म्हणजे पाकिस्तानी सैन्याने भारताची पाच लढाऊ विमाने जमीनदोस्त केल्याचा पोकळ दावा देखील पाकिस्तानकडून केला जात आहे. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

स्वच्छतेचे महत्व ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला स्वच्छतेचे महत्व ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
पुणे: प्रतिनिधी पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबड मोशन पिक्चर्सद्वारा ‘अवकारीका’ हा चित्रपट...
सुप्रसिद्ध-अभिनेते भरत जाधव यांना ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज
मराठी पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी नंदकुमार सातुर्डेकर
वडूथयेथील पुलाचा 180 वा वाढदिवस साजरा
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन!
सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव?

Advt