कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा - प्रसाद भोसले

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा - प्रसाद भोसले

मसूर : उत्पादन खर्चात बचत करून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सहाय्याने उत्पन्न वाढवावे. कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर असून शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन मंडल कृषी अधिकारी प्रसाद भोसले यांनी हेळगाव ता कराड येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पूर्वतयारी बाबत मार्गदर्शन करताना केले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी अजित ओंबासे, जगदीश धुमाळ, पृथ्वीराज एटणे उपस्थित होते.

पृथ्वीराज एटणे यांनी शेतकऱ्यांचा खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने त्यांना बीज प्रक्रिया, बीज उगवण क्षमता, हिरवळीच्या खातंचा वापर, माती नमुना कसा काढावा व मृदा आरोग्य पत्रिका वाचन कसे करावे व त्या आधारे खताचा वापर, हुमनी नियंत्रणासाठी कमी खर्चात सापळा कसा बनवावा, त्याचा वापर, प्रमुख खरीप पिकांच्या नवीन तंत्रज्ञाना बाबत मार्गदर्शन केले.

चौकट

फळपिकांनमध्ये CRA(हवामान अनुकून शेती पद्धती) तंत्रज्ञान बाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागाच्या विविध योजना बाबत माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला खरीप हंगाम सुरू होत आहे. दरवर्षी खरीप हंगामासाठी विविध मोहिमांचे नियोजन केले जाते.यामध्ये विविध प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम कृषिविभाग करत आहे. यावर्षीही ही मोहिम जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे. कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, तालुका कृषि अधिकारी रियाज मुल्ला, तंत्र अधिकारी श्रीमती कोमल घोडके यांचे मार्गदर्शनाखाली राबवल्या जात आहेत. यासाठी विभागातील उप कृषि अधिकारी व उंब्रज मंडलातील सर्व सहाय्यक कृषि अधिकारी यांनी हा कार्यक्रम मंडलातील सर्व गावांमध्ये यशस्वीपणे राबवला. हेळगाव विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी पृथ्वीराज एटणे यांनी आभार मानले.

हे पण वाचा  कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ

0000

Tags:

Advertisement

Latest News

कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस
  कास पठार : जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार कास बामनोली परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने
आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वर नगर मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची उत्साहात स्वागत
आंधळीतील घरफोडीप्रकरणी चोरटा जेरबंद
सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईई आणि नीट परीक्षेत सुयश
कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार
महाराष्ट्र हायस्कूलमध्ये नवांगतांचे स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वितरण
कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ

Advt