यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार

यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार

रणजीतसिंह देशमुख यांनी स्वीकारला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती

सातारा : सातारा जिल्ह्याने लोककल्याणकारी सुसंस्कृत राजकारणाचा यशवंत विचार संपूर्ण देशाला दिला आहे तोच यशवंत विचार सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात नव्या उमेदीने पोहोचवणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकतीने लढले जातील असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले.

येथील काँग्रेस कमिटी मध्ये अत्यंत औपचारिक कार्यक्रमांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत देशमुख यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्याकडून स्वीकारला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव राजेंद्र शेलार, जिल्हा युवक काँग्रेस अमरदीप कांबळे सरचिटणीस नरेश देसाई ,रजनीताई पवार तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रणजीतसिंह देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसला उर्जित अवस्था आणण्यासाठी आपण अथक प्रयत्न करणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पूर्ण ताकतीने लढल्या जातील याबाबतची रणनीती कार्यकर्त्यांशी संवाद साधून लवकरच स्पष्ट केली जाणार आहे. सातारा जिल्ह्याचा सुसंस्कृत राजकारणाचा यशवंत विचार पुन्हा एकदा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्या उमेदीने पोहोचवणार असल्याचे रणजीतसिंह देशमुख यांनी सांगितले

हे पण वाचा  बांधकाम मंत्र्यांच्या उपस्थितीत मेढा शाळेत होणार शाळा 'प्रवेशोत्सव'

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले नूतन जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या आगामी वाटचालीला मी शुभेच्छा देत आहे आगामी काळामध्ये काँग्रेसच्या बैठका सदस्य नोंदणी आणि विचार मंथनकार्यशाळा या अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये घेतल्या जातील येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेतला जाणारा असून यामध्ये आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्यूहरचनेसाठीकार्यकर्त्यांशी संवाद मिळावे घेऊनच काँग्रेस पुढील राजकीय मांडणी लवकरच करणार असल्याचे संकेत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

000000000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

मावळ तालुक्यात भीषण दुर्घटना कुंडमळा पूल कोसळला;२५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती मावळ तालुक्यात भीषण दुर्घटना कुंडमळा पूल कोसळला;२५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती
    वडगाव मावळ/ प्रतिनिधी मावळ तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून भीषण दुर्घटना घडल्याची
शिक्षण मंडळ, कराडचे विद्यार्थी पहिलीपासूनच गिरवणार संस्कृतचे धडे
यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार
पुणे ते सातारा रस्त्यांच्या विकसनाचा पुन्हा डीपीआर बनणार
शिवसेना महिला आघाडीच्या खटाव तालुका प्रमुखपदी मुमताज मुलाणी
मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान
मुसांडवाडी फाटा ते म्हासुर्णे रस्ता गेलाय पूर्ण पणे खड्ड्यात

Advt