मध्यमवर्गाला लवकरच मोठी भेट मिळण्याची शक्यता 

अर्थसंकल्पात वाढू शकते आयकर मर्यादा 

मध्यमवर्गाला लवकरच मोठी भेट मिळण्याची शक्यता 

लवकरच सादर होणारा अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पात सरकारकडून आयकर मर्यादा वाढवून मध्यमवर्गीयांना मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

लवकरच सादर होणारा अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पात सरकारकडून आयकर मर्यादा वाढवून मध्यमवर्गीयांना मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. 
 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतील. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार या अर्थसंकल्पात आयकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे. त्याचा लाभ मध्यमवर्गीय नोकरदार आणि छोटे व्यावसायिक यांना होणार आहे. 
 
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यावर सादर केलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २ लाखावरून अडीच लाखांपर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत ९ वर्षात आयकर आकारणीच्या टप्प्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 
 
या वर्षीचा अर्थसंकल्प मोदी सरकारचा या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आहे. पुढील २०२४ हे सार्वत्रिक निवडणुकांचे वर्ष आहे. त्यामुळे आयकर मर्यादा वाढवून सरकार मध्यमवर्गीयांना खूश करण्याची शक्यता आहे. शिवाय सध्या वाढत्या महागाईमुळे बाजारपेठेत मागणीवर विपरीत परिणाम झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढविल्यास मध्यमवर्गीयांच्या हातातील पैशात वाढ होऊन त्यामुळे बाजारपेठेत मागणी वाढण्याचीही शक्यता आहे. 

 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'भाजपची स्क्रिप्ट वाचून मंत्रिपदाची किंमत चुकवता का?'
नागपूर दंगल सरकारपुरस्कृत आहे म्हणावे का?
BARTI news | वेबसाईट द्वारे महाडचा सत्याग्रह आता मराठीसह कन्नड भाषेतही!
'ऊसतोडणी कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा'
प्रशांत दामले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर
विरोधी गटाचे मताधिक्य रोखण्याचे सत्ताधारी गटाकडे मोठे आव्हान!
निवडणूक सह्याद्री साखर कारखान्याची पण पेरणी मात्र नगरपरिषद निवडणुकीची!
'मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे'
'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक'
आजपासून माथेरान पर्यटकांसाठी बेमुदत बंद