'केवळ सर्वात श्रीमंत संघटना असणे पुरेसे नाही'

वेंगसरकर यांनी बीसीसीआयला सुनावले खडे बोल

'केवळ सर्वात श्रीमंत संघटना असणे पुरेसे नाही'

मुंबई: प्रतिनिधी

आयपीएल स्पर्धांचे आयोजन आणि सामन्यांच्या प्रसारण हक्कातून मिळणारा पैसा हे आपले एकमेव उद्दिष्ट नाही, अशा कठोर शब्दात भारताचे महान फलंदाज आणि निवडकर्ते दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय क्रिकेट नियमक मंडळ आणि निवड समितीला धारेवर धरले आहे. खेळाडू आणि कर्णधार घडविण्यासाठी तुम्ही काहीही प्रयत्न केले नाहीत, असे खडे बोलही त्यांनी सुनावले.

कसोटी विश्वचषक अजिंक्यपद पटकावण्यात अपयश आल्यानंतर भारतीय क्रिकेटवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. बहुतेक वेळी टीकेच्या केंद्रस्थानी कर्णधार राहुल शर्मा हाच राहिला आहे. वेंगसरकर यांनी मात्र भारतीय क्रिकेटच्या दुरवस्थेला बीसीसीआय आणि निवड समितीला जबाबदार धरले आहे.

केवळ जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असणे एवढेच पुरेसे नाही. खेळाडूंची पर्यायी फळी तयार करण्यासाठी बीसीसीआय आणि निवड समितीने काहीही केले नाही. आला खेळाडू की खेळवा त्याला, असेच मागील काही काळापासून धोरण राहिले आहे, अशी टीकाही वेंगसरकर यांनी केली.

हे पण वाचा  नवे वर्ग, नवे मित्र आणि नवीन स्वप्नं... शाळेचा पहिला दिवस खासच असतो!

मागील पाच, सहा वर्षांच्या कालावधीत निवड समितीच्या सदस्यांमध्ये खेळाडूंना पारखण्याची दृष्टी दिसून येत नाही. त्याचप्रमाणे क्रिकेटविषयी सखोल जाण असल्याचेही दिसत नाही. त्यामुळे निवड समितीनेही खेळाडू किंवा पर्यायी कर्णधार घडविण्यासाठी पुढाकार घेतला नाही, असेही वेंगसरकर म्हणाले.

About The Author

Advertisement

Latest News

दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
मेढा : पाचगणी पोलिस स्टेशनचे कार्यक्षम सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पाचगणी पोलिसांनी दाखल गुन्ह्यांमधील...
उपमुख्यमंत्र्याच्या गावकडे जाणारा तापोळा रस्ता गेला वाहून
६५ वर्षांच्या आजींचा रिक्षावर आत्मनिर्भरतेचा प्रवास!
अर्जुन कोळी यांची मिपा औरंगाबादच्या कोअर कमेटी सदस्यपदी निवड
‘टिळक’मध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना मोफत एस.टी. पासचे वितरण
खाजगी शाळेत प्रवेश घेऊन घरपट्टी, पाणी पट्टीची रक्कम मिळवा
डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advt