'दहशतवादविरोधी लढ्यात भारताकडून जगाला खूप अपेक्षा'

शिष्टमंडळाचा विदेश दौरा पार पडल्यावर सुप्रिया सुळे यांनी सांगितले अनुभव

'दहशतवादविरोधी लढ्यात भारताकडून जगाला खूप अपेक्षा'

मुंबई: प्रतिनिधी 

दहशतवादाचे मोठे संकट जगासमोर असून त्याच्या विरोधातील लढ्यात जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असे 'ऑपरेशन सिंदूर' राबविण्यामागील भारताची भूमिका कथन करण्यासाठी विदेश दौऱ्यावर गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

सुळे या कतार, दक्षिण आफ्रिका,इथियोपिया आणि इजिप्त या देशांना भेट देणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात सहभागी झाल्या होत्या. दौऱ्यावरून परतल्यावर त्यांनी आपले अनुभव पत्रकारांना कथन केले. 

भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भारताने चोख प्रत्युत्तर दिले ते योग्यच आहे. मात्र, त्यानंतर भारताने संयम दाखवून या संघर्षाला सर्वंकष युद्धाचे स्वरूप प्राप्त होऊ दिले नाही, हे कौतुकास्पद असल्याच्या भावना विविध देशांच्या प्रतिनिधींनी नमूद केल्याचे सुळे यांनी सांगितले. दहशतवादाचा मुकाबला करतानाही शांततेचा मार्ग कायम ठेवावा, अशी त्या देशांचीअपेक्षा असल्याचेही त्या म्हणाल्या. 

हे पण वाचा  बनेश्वरला सापडला अत्यंत दुर्मीळ प्रजातीचा साप

आपण भेट दिलेल्या सर्व देशांमध्ये महात्मा गांधी यांच्याबद्दल नितांत आदर असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे पं जवाहरलाल नेहरू यांनी या देशांशी जोडलेले नाते, इंदिरा गांधी यांचे कणखर नेतृत्व, मनमोहन सिंग यांचे सर्वसमावेशक परराष्ट्र धोरण आणि नरेंद्र मोदी यांनी या देशांशी असलेल्या मैत्रीत केलेली वृद्धी, याबाबत या सर्व देशांनी आदर व्यक्त केला. तसेच आपण भारताच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली, असेही सुळे यांनी सांगितले. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?' 'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?'
पुणे : प्रतिनिधी भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली? पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली,...
शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट
दिव्यांगाची परवड थांबणार कधी; दिव्यांग व्यक्ती संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव कदम!
नॅशनल पार्क झोपडीवासीयांचा वनवास २५ वर्षे झाली तरी संपेना 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन साजरा  
स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक

Advt