दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्थलांतराबाबत उपोषणामुळे बसलेल्या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली!

दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांचे उपोषण मागे घेण्याची आवाहन

दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्थलांतराबाबत उपोषणामुळे बसलेल्या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली!
नारायणगाव
 
नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच ते वारूळवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारूळवाडी येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाचा आजचा हा चौथा दिवस असून उपोषणकर्ते नितीन भालेराव व शशिकांत पारधी यांची तब्येत खालावली असून वारूळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी त्यांची तपासणी दररोज करीत आहेत. यातील उपोषणकर्ते नितीन भालेकर यांची तब्येत जास्त खालवली असून त्यांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 
 
दरम्यान हे कार्यालय खाजगी जागेमध्ये हलवले जात असल्याच्या निषेधार्थ कार्यालयाच्या शेजारीच्या जागेत या दोघांनी सोमवार दि. २६ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. 
 
याबाबत दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याबाबतचे पत्र दिले असून जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाचे पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. या उपोषणाच्या वेळी माजी चेअरमन आशिष फुलसुंदर, उद्योजक संजय वारुळे, जांबा कोल्हे, माजी उपसरपंच जंगल कोल्हे, दीपक भुजबळ, चैतन्य खांडगे, दुय्यम निबंधक अधिकारी अर्चना पाकळे तसेच नंबरवाडी व ठाकरवाडी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
000
Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt