नितेश राणेंच्या टीकेवर सरनाईकांचे उत्तर :ठाकरे-बंधू युतीवर खुलं मत!
On
पुणे, प्रतिनिधी - "तुम्ही ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, त्या जिल्ह्याच्या निधी वाटपावरून नितेश राणेंनी ‘बाप काढला’," या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत आमच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नाहीत. भावनेच्या भरात बोलणे टाळावे. याबाबत संबंधित मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.”
सरनाईक यांनी यावेळी सांगितले की, “मी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निधी वाटपासंदर्भात पत्र दिले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली आहे. लवकरच या बाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.”
राजकीय एकजुटीबाबत बोलताना सरनाईक म्हणाले, “महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार कुटुंबांनी समाजासाठी मोलाचे योगदान दिले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा मोठा विकास झाला. जर ही कुटुंबे एकत्र येण्याची भावना व्यक्त करत असतील, तर त्यात काहीही गैर नाही.”
सरनाईक पुढे म्हणाले, “जर वेगळे होण्यामागील कारण निष्पन्न झाले असेल आणि त्यातून काही शिकायला मिळाले असेल, तर एकत्र येण्याचा निर्णय होऊ शकतो. पण त्या वेळी घेतलेला निर्णय चुकीचा नसेल, तर पुन्हा एकत्र येण्याची गरज भासत नाही. शेवटी निर्णय हा त्यांचा असतो आणि तो त्यांनीच घ्यावा.”
000
About The Author
Latest News
13 Jun 2025 23:41:08
वडगाव मावळ प्रतिनिधी
निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना निश्चित करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर वडगाव मावळ नगरपंचायत प्रशासनाने तयारी सुरू केली...