शिवसेनेचे विचार घराघरात पोहोचवा

शिवसेनेचे विचार घराघरात पोहोचवा

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा रणजितसिंह भोसले यांना कानमंत्र

सातारा : नसानसात रक्तात भिनलेली, हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा यज्ञकुंड तेवत ठेवणारे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे पाईक असलेले जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका विचारात घेवून शिवसेनेचे विचार घराघरापर्यंत पोहोचवावेत,असा कानमंत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांना दिला.

रणजितसिंह भोसले यांची ३१ मे २0२५ रोजी शिवसेनेच्या सातारा जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली. यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मंत्रालयातील कामकाजानंतर सातारा जिल्ह्यातील दरे गावी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येत असताना साताऱ्यात आले होते. त्यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

हिंदुत्वाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे काम निष्ठेने करणारे आणि शिवसेेना वाढविण्यात जिल्हाप्रमुख म्हणून रणजितसिंह यांच्याकडे पाहिले जात आहे. शिवसेनेचा विचार रणजितसिंह यांचे वडील नानासाहेब भोसले यांनी ज्याप्रमाणे वाढवला अन रुअन रुजवला आणि अंगिकारला. त्याचप्रमाणे आता स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेनुसार रणजितसिंह भोसले यांनीही आपली वाटचाल राजकारणात ठेवली, त्यामुळेच थेट जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे.

हे पण वाचा  किती पक्ष बदलले ते पहा

रणजितसिंह भोसले यांचे वडील नानासाहेब भोसले हे शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हाप्रमुख होते. शिवसेनेचे बाळकडू त्यांना त्यांच्या घरातुनच मिळालेले आहे. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणुन त्यांनी जिल्ह्यात युवा सेना अधिक जोमाने वाढवली. पक्ष संघटन कार्यकर्त्यांना बळ देणे सर्वसामान्यांच्या हिताची काम करणे ही, त्यांची हातोटी आहे.

स्थानिक संस्थांच्या निवडणुकात रणजितसिंहावर मोठी जबाबदारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता शिवसेनेनेही आक्रमक पध्दतीने बांधणी सुरु केली आहे. सातारा जिल्ह्यात पक्षवाढीच्या जबाबदारीबरोबर शिवसेना पक्ष वाढविण्याबाबत मायक्रोप्लॅनिंग केले आहे. याची मोठी जबाबदारीही रणजितसिंह भोसले यांच्यावर समन्वयक म्हणून दिली आहे. ती निश्चितच पार पाडतील, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांचा सत्कार करताना व्यक्त केला.

00000000000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार
रणजीतसिंह देशमुख यांनी स्वीकारला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती सातारा : सातारा जिल्ह्याने लोककल्याणकारी सुसंस्कृत...
पुणे ते सातारा रस्त्यांच्या विकसनाचा पुन्हा डीपीआर बनणार
शिवसेना महिला आघाडीच्या खटाव तालुका प्रमुखपदी मुमताज मुलाणी
मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान
मुसांडवाडी फाटा ते म्हासुर्णे रस्ता गेलाय पूर्ण पणे खड्ड्यात
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारत चौथ्या क्रमांकाची महासत्ता
अहमदाबाद विमान दुर्घटनेत कराडची कन्या गमावली

Advt