पुणे ते सातारा रस्त्यांच्या विकसनाचा पुन्हा डीपीआर बनणार

पुणे ते सातारा रस्त्यांच्या विकसनाचा पुन्हा डीपीआर बनणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांची माहिती

सातारा : पुणे बेंगलोर रस्त्याच्या विकसनाचे काम सहा वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप सुरूच आहे यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अपडेट दिली आहे पुणे सातारा रस्त्याच्या विकसनाचा स्वतंत्र एकदा डीपीआर बनवून त्या दृष्टीने या रस्त्याचे रुंदीकरण आणि विकसन केले जाईल असे आश्वासन केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. यासंदर्भात त्यांची भेट घेतली असून या कामाला लवकरच गती दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला अकरा वर्ष नुकतीच पूर्ण झाली त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली .आनेवाडी टोल नाक्यापासून सातारकरांना मुक्ती केव्हा मिळणार? या प्रश्नावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून १२१ किलोमीटरचा महामार्ग गेला आहे. मात्र दुर्दैवाने सातारा जिल्ह्यातील रस्ते रुंदीकरण कामासाठी दुर्दैवाने कॉन्ट्रॅक्टर चांगले मिळाले नाहीत. टोलमुक्ती देण्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी आहेत केंद्र सरकारच्या या प्रकल्पांसाठी ज्या बँका वित्त पुरवठा करतात त्यांना अनामत हमी द्यावी लागते तसेच केंद्र सरकार व ठेकेदार रिलायन्स इन्फ्रा यांच्यामध्ये काही तांत्रिक वाद सुरू आहेत मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तांत्रिक अडचणी सुटल्यानंतर पुणे सातारा रस्त्याचा स्वतंत्र नियोजन प्रकल्प बनवून त्या दृष्टीने रस्त्यांचे विकसन केले जाईल आणि महामार्गाच्या सर्व सुविधा दिल्या जातील त्यामध्ये कदाचित टोलमुक्तीचा विषय होऊ शकतो असे आश्वासन दिले आहे. खंडाळा तालुक्यातील बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे पुण्यावरून सातारा येतानांचा बोगदाही लवकरच सुरू केला जाईल या संदर्भातही गडकरी साहेबांनी खात्री दिल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना जोडणाऱ्या पुला संदर्भातही त्यांनी भाष्य केले ते म्हणाले सातारा व जावळी तालुक्यातील सावरी व आपटी या दोन ठिकाणी बामनोली कास या भागांना जोडणारे दोन स्वतंत्र पूल बनवले जात असून या प्रकल्पाचा ३०० कोटी रुपये खर्च आहे यामुळे हा परिसर थेट सातारा जिल्हा व रत्नागिरी जिल्हा यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटाला जोडला जाणार आहे त्यामुळे कोकण आणि सातारा जिल्हा यांचा थेट संपर्क रस्त्याच्या माध्यमातून प्रस्थापित होणार आहे सातारा शहरातील प्रस्तावित रिंग रोडची ही त्यांनी माहिती दिली ते म्हणाले या प्रकल्पाला सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक मान्यता दिली आहे याचा डीपीआर बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे मात्र या कामासाठी जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव बनवावा लागणार आहे याकरिता २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तसेच बोगदा ते दरे माळवाडी ते थेट मेढा खिंड रोडला रस्ता जोडून सातारा शहरातील वाहतुकीचा ताण कमी केला जाणार आहे या कामाच्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर हे काम लवकरच सुरू केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

हे पण वाचा  महाराष्ट्रातील गडकोट किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर कायम स्वरुपी भगवा झेंडा उभारावा - विकास गोसावी

पाटणचे राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचा प्रवेश हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांना रोखण्यासाठी आहे का? या प्रश्नावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले प्रत्येकाला कामाच्या महत्त्वाकांक्षा असतात ती पूर्ण करून घेण्यासाठी सत्ताधारी पक्ष महत्त्वाचा असतो भाजपमध्ये अनेक जणांचे इनकमिंग होत आहे. सत्यजितसिंह पाटणकर यांचा प्रवेश हा कोणाला रोखण्यासाठी झालेला नाही आमची महायुतीची सत्ता आहे आम्ही सगळे मिळून काम करतो शंभूराजे हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यामुळे व्यक्तिगत कोणाचा प्रवेश हा कोणाला रोखण्यासाठी हा राजकीय हेतू बिलकुल नाही हेतू हा विकासाचा आहे असे त्यांनी स्पष्ट केले .ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल काँग्रेसचे नेते टीका करत असतात या प्रश्नावर बोलतानाही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही काँग्रेसच्या नेत्यांकडे आता सत्ता नाही त्यामुळे त्यांचे नेते या ऑपरेशन विषयी सातत्याने शंका घेत असतात ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण पाकिस्तानला जोरदार झटका दिला मात्र भारतावर निर्बंध घालण्याची कोणत्याही देशाने भाषा वापरली नाही यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची उंची समजून येते असे ते म्हणाले.

000000000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

शिक्षण मंडळ, कराडचे विद्यार्थी पहिलीपासूनच गिरवणार संस्कृतचे धडे शिक्षण मंडळ, कराडचे विद्यार्थी पहिलीपासूनच गिरवणार संस्कृतचे धडे
कराड : संस्कृत भाषा अध्ययनातून भारतीय संस्कृती व भारतीय संस्काराची बीजे बालवयातच विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजण्यासाठी शिक्षण मंडळ, कराडतर्फे इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना...
यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार
पुणे ते सातारा रस्त्यांच्या विकसनाचा पुन्हा डीपीआर बनणार
शिवसेना महिला आघाडीच्या खटाव तालुका प्रमुखपदी मुमताज मुलाणी
मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान
मुसांडवाडी फाटा ते म्हासुर्णे रस्ता गेलाय पूर्ण पणे खड्ड्यात
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारत चौथ्या क्रमांकाची महासत्ता

Advt