'वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावी काळजी'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आवाहन

'वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावी काळजी'

पुणे: प्रतिनिधी 

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मागच्या 24 तासात तब्बल 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या संसर्गाच्या काळात मृतांची संख्या 25 झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दर आठवड्याला राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकी त करोना परिस्थितीचा आढावा घेतला जातो आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

राज्यात शुक्रवारी 102 नव्या रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णांची संख्या एक हजार 914 एवढी झाली आहे. नव्या 102 रुग्णांपैकी सर्वाधिक 26 रुग्ण मुंबई तर 25 रुग्ण पुण्यातील आहेत. पिंपरी चिंचवड, संभाजीनगर,  सांगली ग्रामीण अमरावती आणि नागपूर या ठिकाणी रुग्णांची संख्या  प्रत्येकी पाच आहे.

राज्यात तरुणांची संख्या वाढत असली तरी देखील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, वयस्कर नागरिक, इतर अनेक विकारांचे रुग्ण यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गर्दी करण्याचे व गर्दी या ठिकाणी जाण्याचे शक्यतो टाळावे. शिंका किंवा खोकला येत असल्यास नॅपकिन व रुमालाचा वापर करावा, असे अजित पवार यांनी सांगितले. 

हे पण वाचा  परळी बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाबाबत जनसुनावणी संपन्न

About The Author

Advertisement

Latest News

यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार
रणजीतसिंह देशमुख यांनी स्वीकारला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती सातारा : सातारा जिल्ह्याने लोककल्याणकारी सुसंस्कृत...
पुणे ते सातारा रस्त्यांच्या विकसनाचा पुन्हा डीपीआर बनणार
शिवसेना महिला आघाडीच्या खटाव तालुका प्रमुखपदी मुमताज मुलाणी
मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान
मुसांडवाडी फाटा ते म्हासुर्णे रस्ता गेलाय पूर्ण पणे खड्ड्यात
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारत चौथ्या क्रमांकाची महासत्ता
अहमदाबाद विमान दुर्घटनेत कराडची कन्या गमावली

Advt