- राज्य
- 'वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावी काळजी'
'वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावी काळजी'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आवाहन
पुणे: प्रतिनिधी
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मागच्या 24 तासात तब्बल 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या संसर्गाच्या काळात मृतांची संख्या 25 झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दर आठवड्याला राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकी त करोना परिस्थितीचा आढावा घेतला जातो आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यात शुक्रवारी 102 नव्या रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णांची संख्या एक हजार 914 एवढी झाली आहे. नव्या 102 रुग्णांपैकी सर्वाधिक 26 रुग्ण मुंबई तर 25 रुग्ण पुण्यातील आहेत. पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, सांगली ग्रामीण अमरावती आणि नागपूर या ठिकाणी रुग्णांची संख्या प्रत्येकी पाच आहे.
राज्यात तरुणांची संख्या वाढत असली तरी देखील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, वयस्कर नागरिक, इतर अनेक विकारांचे रुग्ण यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गर्दी करण्याचे व गर्दी या ठिकाणी जाण्याचे शक्यतो टाळावे. शिंका किंवा खोकला येत असल्यास नॅपकिन व रुमालाचा वापर करावा, असे अजित पवार यांनी सांगितले.