महाराष्टातील मातंग समाजाचे जन आक्रोश महाआंदोलन

महाराष्टातील मातंग समाजाचे जन आक्रोश महाआंदोलन
मुंबई / रमेश औताडे 
 
अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून जून २०२५ पासून ते लागू करावे या व इतर मागण्या घेऊन महाराष्ट्रातील सकल मातंग समाज मंगळवारी आझाद मैदानात आंदोलनात उतरला होता. राज्यभरातून आलेल्या या समाजाने जय लहुजीचा नारा देत सर्व आझाद मैदान परिसर दणाणून सोडला.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड्यापाड्यातून आलेल्या या समाजाच्या पिण्याच्या पाण्याची व जेवणाची सोय केली होती. समाजाचे नेते राजू मानकर यांनी यावेळी भर भव्य मंडपात जेवण वाटप नियोजन केले होते त्याचे आंदोलनकर्ते कौतुक करत होते.राष्ट्रीय मातंग स्वाभिमानी संघटन चे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते.राज्य समन्वयक मारुती वाडेकर व आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
 
राज्यभरातून असलेल्या या हजारोंच्या संख्येतील आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून  कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी शेकडो पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खुप लढलो बेकीने आता लढूया एकीने असा फलक लाऊन हे आंदोलन सुरू होते.महाराष्ट्रील हिंदू मातंग समाज आजही अनेक प्रकारे विकासापासून दूर आहे.सरकारने आमच्या मागण्या आता मान्य केल्या नाही तर यापुढचे आंदोलन तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
 
000
Tags:

About The Author

Advertisement

Latest News

ख्रिश्चन समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व द्या: पी विल्सन ख्रिश्चन समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व द्या: पी विल्सन
पुणे : प्रतिनिधी देशात ख्रिस्ती समाजावर दिवसागणिक अत्याचार वाढत आहेत. संविधानिक हक्काचा भंग काही जातीवादी शक्ती करीत आहेत. मणिपूरचा प्रसंग,...
नागालँडमधील सात आमदारांनी सोडली अजितदादांची साथ
रॅगिंग प्रकरणी तीन विद्यार्थी डॉक्टरांचे निलंबन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
'हिंदी बनली मुंबईची बोलीभाषा, तीच आमची लाडकी बहीण'
'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन'
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मुंबई युवक अध्यक्षपदी संतोष कदम!

Advt