'हेमंत पाटील हे अण्णा हजारे यांचे खरे वारसदार'

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वनारसे यांचे मत

'हेमंत पाटील हे अण्णा हजारे यांचे खरे वारसदार'

पुणे: प्रतिनिधी 

भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील धडाडीचे कार्यकर्ते आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे संस्थापक अध्यक्ष हेमंत पाटील हेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील खरे वारसदार आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वनारसे यांनी व्यक्त केले. 

हेमंत पाटील हे भ्रष्टाचार समूळ उखडून काढण्यासाठी तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. मुंबईपासून दिल्लीपर्यंत त्यांनी कडवा संघर्ष केला आहे. त्याचप्रमाणे धनगर आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या समस्यांच्या निवारणासाठी देखील पाटील यांनी भरीव कार्य केले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी त्यांनी वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे, असेही वनारसे यांनी सांगितले. पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्यावर जबाबदारीचे पद सोपवावे. त्यामुळे समाजाचे भरे होण्यास मदत होणार आहे, अशी मागणी देखील वनारसे यांनी केली. 

अण्णांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने ...

हे पण वाचा  आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात भात खाचरांना तलावांचे स्वरूप

प्रत्यक्ष राजकारणात न जाता समाज सेवा करण्याच्या किंवा अन्य काही ध्येयधोरणांच्या बाबतीत अण्णा हजारे यांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका, असे सुचविणारे पत्र पाटील यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना दिले होते. मात्र, अण्णांच्या संध्याकाळी दुर्लक्ष केल्यानेच केजरीवाल यांची आज दुरवस्था झाली असल्याचे, वनारसे यांनी सांगितले. एक चांगला नेता असून देखील काही निर्णय व धोरणे चुकल्यामुळेच केजरीवाल यांच्यावर राजकीय संकट कोसळल्याचे ही ते म्हणाले.

About The Author

Advertisement

Latest News

'मुस्लिम धर्मस्थळांवर एकतर्फी कारवाई अन्यायकारक' 'मुस्लिम धर्मस्थळांवर एकतर्फी कारवाई अन्यायकारक'
पुणे : प्रतिनिधी  केवळ हिंदुत्ववाद्यांचा अट्टाहास पुरवण्यासाठी मुस्लिम धर्मस्थळावर केली जाणारी एकतर्फी कारवाई अन्यायकारक असून अशा प्रकारच्या कारवाईला कायदेशीर विरोध...
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर काढणार चित्रपट'
'लघुउद्योग हा आत्मा कायम ठेऊनच धारावीचा पुनर्विकास'
घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? - हर्षवर्धन सपकाळ
छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक!
उपमुख्यमंत्री पवार यांचा "माळेगाव" कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल!

Advt