रक्तदान केवळ श्रेष्ठ दान नसून जीवनदान - डाक अधीक्षिका स्वाती दळवी

रक्तदान केवळ श्रेष्ठ दान नसून जीवनदान - डाक अधीक्षिका स्वाती दळवी

कराड डाक विभागात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड : रक्तदान हे केवळ श्रेष्ठ दान नसून ते जीवनदान आहे. आजच्या काळात रक्ताची गरज ही केवळ अपघातग्रस्तांसाठी नव्हे; तर अनेक गंभीर आजारांसाठीही महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन कराड विभागाच्या डाक अधीक्षिका स्वाती दळवी यांनी केले.

१४ जून या जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून भारत सरकारच्या डाक विभागामार्फत कराड प्रधान डाकघर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डाक अधीक्षिका स्वाती दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे अधीक्षिका स्वाती दळवी यांनी स्वतः रक्तदान करून उपस्थितांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले.

शिबिराच्या आयोजनावेळी डाक अधिकारी अमृत कुमटकर, अमित देशमुख, पोस्टमास्तर रामलिंग राजमाने, तसेच वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजवर्धन पाटील, सुनिता कुंभार, कुमुदिनी दळवी, नागनाथ केंद्रे, मंगेश पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

हे पण वाचा  २३९ भावी मेहरबाणांच्या भवितव्याचे वाजले बिगुल

रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने रक्त संकलनाचे नियोजन सुरळीतपणे पार पाडण्यात आले. या उपक्रमास डाक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यामध्ये चंद्रकांत पवार, महेश लोहारे, सखाराम देवकाते, जी. के. पाटील, शंकर सुतार, श्रीराम शिंदे, सतीश आलमवाड, उमेश मोहिते, नितीन पाटील, अभिजीत जाधव, पांडुरंग निळे, शाहीर सानप यांसह कराड विभागातील अनेक डाक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. त्यांच्या या सहभागामुळे रक्तदान शिबिर अधिक यशस्वी झाले असून या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कार्यक्रमात डॉ. यशवर्धन पाटील, डाक अधिकारी अमित देशमुख आणि उमेश मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त करत रक्तदानाचे सामाजिक आणि वैद्यकीय महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर केंद्रे यांनी केले. या उपक्रमानिमित्ताने रक्तदात्यांना वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड यांच्यावतीने प्रमाणपत्र वितरित करून सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे कराड डाक विभागाने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.

Tags:

Advertisement

Latest News

यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार
रणजीतसिंह देशमुख यांनी स्वीकारला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती सातारा : सातारा जिल्ह्याने लोककल्याणकारी सुसंस्कृत...
पुणे ते सातारा रस्त्यांच्या विकसनाचा पुन्हा डीपीआर बनणार
शिवसेना महिला आघाडीच्या खटाव तालुका प्रमुखपदी मुमताज मुलाणी
मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान
मुसांडवाडी फाटा ते म्हासुर्णे रस्ता गेलाय पूर्ण पणे खड्ड्यात
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारत चौथ्या क्रमांकाची महासत्ता
अहमदाबाद विमान दुर्घटनेत कराडची कन्या गमावली

Advt