शिक्षण मंडळ, कराडचे विद्यार्थी पहिलीपासूनच गिरवणार संस्कृतचे धडे

शिक्षण मंडळ, कराडचे विद्यार्थी पहिलीपासूनच गिरवणार संस्कृतचे धडे

कराड : संस्कृत भाषा अध्ययनातून भारतीय संस्कृती व भारतीय संस्काराची बीजे बालवयातच विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजण्यासाठी शिक्षण मंडळ, कराडतर्फे इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना संस्कृतचे धडे गिरवायला शिकवले जाणार आहे.

नवीन शिक्षण धोरण 2020 नुसार बहुभाषिकतेला प्राधान्य दिले आहे. संस्कृत भाषा सर्व भाषांची जननी आहे.म्हणून भाषिक क्षमता व संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी, उच्चारण सुधारण्यासाठी संस्कृत भाषा अध्ययन व अध्यापन इयत्ता पहिलीपासूनच शिक्षण मंडळाच्या सर्व प्राथमिक गटातील शाखांमध्ये शिकवली जाणार आहे. यासाठी शिक्षण मंडळ, कराडने स्वतःचा संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम, तसेच तो राबवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची म्हणजे साधन व्यक्तींची फळी तयार केली आहे. संस्कृत भाषेचा 'मधुर संस्कृतम' हा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे. नूतन मराठी शाळा, कराड व इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा, कराड (SMS), बाल विद्यालय, ओगलेवाडी या संस्थेच्या प्राथमिक शाळांमधून सदर संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.

संस्कृत भाषेमधून भारतीय संस्कृतीचे संस्कार होण्यासाठी प्रतिवर्षी भगवद्गीतेतील एका अध्यायाची संथा विद्यार्थ्यांना दिली जाते. संपूर्ण भगवद्गीता केवळ दोन मिनिटात लिहून पूर्ण करण्याचा विक्रम सुद्धा लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये संस्थेने नोंदवला आहे. तसेच संस्कृत भाषा अध्ययन सुकर होण्यासाठी संस्थेतर्फे 'संस्कृतिका' ही संस्कृत भाषा प्रयोगशाळा सुद्धा उभारण्यात आली आहे. संस्कृत अध्यापिका माधुरी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील सर्व संस्कृत शिक्षकांनी 'सांस्कृतिका' या संस्कृत भाषा प्रयोगशाळेच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान दिले आहे.

शिक्षण मंडळ, कराड ही शैक्षणिक नेतृत्व करणारी संस्था आहे. परिसरातील इतर सर्व शैक्षणिक संस्थांना या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण मंडळ, कराड सदैव तत्पर आहे. परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी 'संस्कृतिकेला' भेट द्यावी व संस्कृत भाषेचे उपक्रम जाणून घ्यावेत, असे आवाहन शिक्षण मंडळ, कराडचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर व सर्व संचालकांनी केले आहे.

हे पण वाचा  शिवसेनेचे विचार घराघरात पोहोचवा

0000000000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

मावळातील कुंडमळा दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू; ३८ जणांना वाचविण्यात यश मावळातील कुंडमळा दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू; ३८ जणांना वाचविण्यात यश
मावळमधील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत किमान २५ ते ३० पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत...
मावळ तालुक्यात भीषण दुर्घटना कुंडमळा पूल कोसळला;२५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती
शिक्षण मंडळ, कराडचे विद्यार्थी पहिलीपासूनच गिरवणार संस्कृतचे धडे
यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार
पुणे ते सातारा रस्त्यांच्या विकसनाचा पुन्हा डीपीआर बनणार
शिवसेना महिला आघाडीच्या खटाव तालुका प्रमुखपदी मुमताज मुलाणी
मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान

Advt