- राज्य
- विजेवर चालणाऱ्या वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी
विजेवर चालणाऱ्या वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी
मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरही होणार टोलमाफी
On
मुंबई: प्रतिनिधी
विजेवर चालणाऱ्या चार चाकी वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी करण्यात आली असून लवकरच पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरही विजेवर चालणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे.
एप्रिल महिन्यात सरकारने वाहतुकीमुळे होणारे कर्ब उत्सर्जन, प्रदूषित आणि हरित गृह वायू उत्सर्जन रोखण्यासाठी धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अटल सेतू, समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग त्यांच्यासाठी टोलमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. आता ती अमलात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर देखील विजेवर चालणाऱ्या वाहनांना टोल आकारणीत पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे.
About The Author
Related Posts
Latest News
22 Aug 2025 09:09:43
सांगोला: प्रतिनिधी
धमक्या देणाऱ्या गोरक्षकांन खडे बोल सुनावताना, माझ्या नादाला लागलात तर मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. नांगराचा फाळ तुमच्या..., असे...