नियंत्रित व नियोजित बांधकाम हाच वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केले मत

नियंत्रित व नियोजित बांधकाम हाच वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय

पुणे: प्रतिनिधी

वेगाने वाढणाऱ्या पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. या समस्येवर वाहतुकीच्या नियोजनापेक्षाही नियंत्रित व नियोजित बांधकाम हाच प्रभावी उपाय असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केले. 

पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवलकिशोर राम यांना आज 'राजीव गांधी स्मारक समिती'च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी स्मारक समितिचे संस्थापक अध्यक्ष, काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांच्यासह काँग्रेसच्या लिगल सेलचे अँड फैयाज शेख, अँड श्रीकांत पाटील, धनंजय भिलारे, गणेश शिंदे, संजय अभंग, गणेश मोरे, योगेश भोकरे, आशीष गुंजाळ उपस्थित होते.

या वेळी पुणे शहराचा विकास, वाहतूक कोंडींची ज्वलंत समस्या, आरोग्य सेवा व पुणे मनपा प्रशासन कालीन ऑडिट रिपोर्ट इ संदर्भातील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच आयुक्तांचा तिरंगा उपरणे व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व शिव मुद्रेचे पेन देऊन स्वागत करण्यात आले.

हे पण वाचा  निलेश चव्हाण याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी

आयुक्त नवलकिशोर राम यांना दिलेल्या निवेदनात पुणे शहराच्या ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधले आहे. तसेच प्रशासकीय काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपावर प्रशासनाकडून पुणेकर जनतेस स्पष्टीकरण मिळावे यासाठी  गेल्या ३ वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल प्रसिद्ध करून कार्यवाही बाबत माहिती द्यावी, अशी मागणी नवीन आयुक्तांकडे करण्यात आली.

नवनियुक्त आयुक्तांसमोर अनेक प्रलंबित कामाची व महापालिका निवडणूक पार पाडण्याची आव्हाने आहेत. विशेषत: पुणे शहरातील वाहतूक कोंडीची ज्वलंत समस्या लक्षात घेता,  मेट्रो इ चा अतिरिक्त एफएसआय व बाहेरील टीडीआर (विकतचे चटई क्षेत्र) यांची उधळण मोठ्या प्रमाणात सुरू असून पुणे शहरातील पूर्वीच्याच रस्त्यांवरील प्लॉटवर २० ते ३० मजली इमारतींना आवश्यक वाहतूक सोयीविना परवानग्या दिल्या जात आहेत. सदर इमारतीमधील किमान १० ते १५ टक्के नागरिक वा त्यांचे पाहुणे जरी एक ठिकाणाहून दुसरीकडे जावयाचे झाल्यास रस्ते अत्यंत तोकडे पडत आहेत, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

पुणे शहराचा रुंदावणारा आडवा व समतोल विकास होण्याऐवजी  उंचवणारा उभा विकास होत असल्याने गर्दीयुक्त वाहतूकीच्या खाईत पुणे शहर ढकलले जात आहे. त्यामुळे वाहतूक नियोजन ही समस्या नसून, इमारतींचे अयोग्य नियोजन व अवास्तव बांधकाम परवानगी या समस्या आहेत. पुणे शहराचे डीपी (विकास आराखडा) वा टीपी (नगर रचना) हे मात्र कागदांवर पूर्वीचेच असून'मेट्रो’च्या आगमना नंतर वास्तविक डीपी व टीपीमध्ये धोरणात्मक बदल होणे गरजेचे होते. मात्र, ते वेळीच न झाल्याने पुणे शहर आज वाहतुकीच्या कोंडीत अडकले आहे, याकडे नवनियुक्त आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. 

मेट्रोचा पुरेपूर उपयोग होण्याच्या दृष्टीने प्रत्येक मेट्रो स्टेशन जवळ मुबलक दोनचाकी व चारचाकी पार्किंग व्यवस्था अत्यावश्यक होती. मात्र, ती उभी राहू शकली नाही. त्यामुळे आपण या समस्येचा तातडीने बोध घेऊन, नगर रचना संचालक यांचे समवेत चर्चा करून पुणे शहरासाठी आवश्यक रुंदीच्या रस्त्यांची व पार्किंगची व्यवस्था होईपर्यन्त तसेच मेट्रोसिटीसाठीचा डीपी व टीपी होईपर्यन्त, मुक्त व अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूरी (रद्द न करता) तूर्त स्थगित वा नियंत्रित करावी, जेणे करून पुणेकरांची जीवघेण्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी मागणी देखील निवेदनात केली आहे.                      

तसेच पुणे मनपा निवृत्त सेवकांना ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मनपा सर्वसाधारण सभा व शासन परिपत्रकानुसार सत्वर देणेबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच पुणे मनपा आरोग्य विषयक सुविधा, वाढत्या शहरीकरणाच्या गरजेनुसार रुग्णालय व तपासणी केंद्रांची उभारणीकडे ही राजीव गांधी स्मारक समितीने लक्ष वेधले आहे.

About The Author

Advertisement

Latest News

'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?' 'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?'
पुणे : प्रतिनिधी भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली? पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली,...
शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट
दिव्यांगाची परवड थांबणार कधी; दिव्यांग व्यक्ती संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव कदम!
नॅशनल पार्क झोपडीवासीयांचा वनवास २५ वर्षे झाली तरी संपेना 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन साजरा  
स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक

Advt