परळी बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाबाबत जनसुनावणी संपन्न
शासनाला अहवाल सादर करणार - अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली
On
गगनबावडा : परळी ता.शाहुवाडी येथील बॉक्साईट (Baxite) प्रकल्पासाठी परळी पैकी मांडवकरवाडी येथे अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण विषयक जाहीर जन सुनावणी संपन्न झाली. श्री मल्हार मिनरल्स कंपनीच्या संमर्थनासाठी परळी भागातीलष वाड्या- वस्त्यावरील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. नियोजित असलेला हा प्रकल्प परळीसह तालुक्याच्या विकासाची नवी क्रांती ठरेल. रोजगार निर्मिती बरोबर भागातील रस्ते, वीज पाणी ! शिक्षण आणि आरोग्य याच सुधारलेल्या जाळ तयार होण्यास मदत होणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. अशी भूमिका बहुतांशी नागरिकांनी मांडत बॉक्साईट प्रकल्पाला पाठिंबा देत प्रकल्प लवकर सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान प्रस्तावित बॉक्साइट खाण प्रकल्पामुळे जैवविविधता धोक्यात येईल, वन्यजीवांच्या आदिवासावर त्याचा परिणाम होईल. भूजल पातळी खालावेल. याचा त्रास स्थानिकांना होईल . असा दावा करत काही नागरिकांनी प्रकल्पाला विरोध दर्शवत प्रकरण रद्द करण्याची मागणी केली. या जनसुनावणीचा संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठवणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.
जनसुनावणीला उपस्थित नागरिकांना प्रकल्प बाबतची सर्व माहिती स्क्रीनच्या माध्यमातून देण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांच्या सूचनेनंतर समर्थक गट व विरुद्ध गटांमधील नागरिकांना प्रकल्पाबाबत भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली. मानसिंग सावरे, तानाजी रवंदे, दत्ता खोत आदींनी प्रकल्प कसा विनाशवादी आहे. त्याचा पर्यावरणावर परिणाम होणार आहे . याबद्दल भूमिका मांडत प्रकल्प होऊ देणार नाही . असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. श्री मल्हार मिनरल्स कंपनीचे भागीदारी युवराज पाटील यांनी प्रकल्पामुळे होणारी रोजगार निर्मिती त्याचबरोबर स्थानिक ग्रामीण व्यवस्थेला येणाऱ्या आर्थिक बळकटी यावर सविस्तर भूमिका मांडली. पर्यावरणाचा ऱ्हास होणार, असे विरोधकांकडून नेहमीच ओरड केली जाते, परंतु त्यांची मुद्दे तथ्यहीन आहेत. स्थानिक राजकारणातून या प्रकल्पाला विरोध केला जातोय. या प्रकल्पासाठी वन विभागासह इतर सर्व विभागाच्या आवश्यक त्या परवानगी मिळाल्या आहेत .परळी परिसराती ग्रामपंचायतीने ऐंशी टक्के मताधिक्याने मंजूर केलेले गाव सभेचे ठराव प्रकल्पाच्या समर्थांसाठी दिले आहेत. राजकीय व सुडबुद्धीतून स्थानिक राजकारणातून बोटावर मोजणे इतपत काही लोकांचा या प्रकल्पाला विरोध होत आहे . परंतु परळी भागातील जनतेच्या आशीर्वादावर व शासनाचे सर्व नियम तंतोतंत पाळत हा प्रकल्प पुर्णत्वास नेवू. असा विश्वास क्ष पाटील यांनी व्यक्त करताच सभामंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी सरपंच शुभांगी कांबळे , संजय खोत , रामभाऊ परळीकर , बाजीराव सावरे आदींनी प्रकल्प बाबत समर्थनात भूमिका मांडल्या . काही तरुणांनी आरडा ओरड गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत शांतता निर्माण केली. अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी आपले कौशल्य दाखवत दोन्ही गटाच्या नागरिकांकडून जन सुनावणी यशस्वी व शांतता पूर्ण करून घेतली . महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत ,उप प्रादेशिक अधिकारी व्हि . व्हि. किल्लेदार तसेच प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहुवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी विजय घेरडे , कळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
शासनाच्या कोणत्याही परवानगी घेतलेल्या नाहीत . पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे . असा कांगावा करत तथ्यहीन आरोप विरोधकांकडून स्थानिक राजकारणातून केले जात आहेत . जनतेची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांनी शासनाच्या परवानग्या खोट्या आहेत हे सिद्ध करुन दाखवावे . वन ,महसुल व पर्यावरण तसेच विविध विभागाच्या आवश्यक परवानगी घेवूनच प्रस्ताव सादर करणेत आलाय . प्रकल्प नक्कीच पुर्णत्वास नेवू - युवराज पाटील, मल्हार मिनरल्स, कंपनी भागीदार
" येथील स्थानिकांना या प्रकल्पामूळे परिणाम भोगावे लागणार आहे . प्रकल्प रद्द करणेसाठी शासन दरबारी पाटपुरावा करुन हा आमच्यावर लादलेला प्रकल्प हाणून पाडू " मानसिंग सावरे , तानाजी रवंदे , स्थानिक रहिवाशी.
000
Tags:
About The Author
Related Posts
Latest News
14 Jun 2025 12:47:03
पुणे: प्रतिनिधी
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मागच्या 24 तासात तब्बल 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या...