साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त संत संमेलन

संत बौद्धिक मंच आणि नरेंद्र मोदी विचार मंचच्या वतीने आयोजन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त संत संमेलन

पुणे: प्रतिनिधी 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच आणि नरेंद्र मोदी विचार मंचच्या वतीने भव्य संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलना अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, ही आग्रही मागणी करण्यात येणार आहे. 

गंजपेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 4 यावेळी होणाऱ्या या कार्यक्रमाला संत बौद्धिक मंचाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्वामी स्वदेशानंद ब्रह्मगिरी महाराज अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून नरेंद्र मोदी विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी चाणक्य यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यमराज खरात हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. 

या संमेलनात भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावे आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिले जावे, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला जावा, या मागण्या प्रामुख्याने मांडल्या जाणार आहेत. 

हे पण वाचा  'लोकनाट्य कला केंद्रातील गोळीबार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न'

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळावा यासाठी करण्याच्या उपक्रम आणि उपाययोजना, याबाबत सखोल विचार करण्यात येईल.

भारताला हिंदुराष्ट्र घोषित करावे, यासाठी आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच आणि नरेंद्र मोदी विचार मंच या दोन्ही संस्थांकडून व्यापक स्वरूपात कार्य करीत आहेत. विशेषतः भारतीय तत्त्वज्ञान जगाला मार्गदर्शक असल्याची या संस्थांची धारणा असून भारतीय तत्त्वज्ञान जगभरात पोहोचविण्यासाठी या संस्था सातत्याने काम करीत आहेत.

About The Author

Advertisement

Latest News

 डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर
पिंपरी: प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची बहुप्रतीक्षित कार्यकारिणी बैठक बुधवार, २३ जुलै रोजी हॉटेल कुणाल, तापकीर चौक, काळेवाडी, पिंपरी...
मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर...
'लोकनाट्य कला केंद्रातील गोळीबार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न'
मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने ‘लोन आणि सबसिडी एक्स्पो-2025’ चे आयोजन
'अजित पवार यांनीच कृषी मंत्री पदाची जबाबदारी घ्यावी'
एमआयडीसी परिसरात दोन कंपन्यांना भीषण आग
'शालेय विद्यार्थी हत्या प्रकरणी अघोरी बाबाची चौकशी करा'

Advt