नैसर्गिक ओढे नाले बुजवल्यामुळे केसनंद मध्ये घराघरात पाणी घुसले....
आमची नुकसान भरपाई कोण देणार.? याला जबाबदार कोण.? नागरिकांचा संतप्त सवाल
On
वाघोली, विजय लोखंडे
काल झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे केसनंद गावामध्ये मुख्य चौक आणि गावठाण परिसरातील दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पूर्वी केसनंद आणि वाघोली च्या सीमेवर व केसनंद परिसरात असणाऱ्या डोंगरावर पाऊस पडल्यानंतर डोंगराच्या खाली असलेल्या असणाऱ्या नाले,ओढ्यांमधून पाणी केसनंद येथून वाहत जाऊन येथील तळ्यामध्ये जमा होत होते.परंतु केसनंद येथील नागरीकरण वाढल्यामुळे नवीन वाढत जाणाऱ्या दुकानदारीमुळे,बिल्डर व्यवसायिक यांच्यामुळे जोगेश्वरी हायस्कूल पासून ते केसनंद गावापर्यंत जो नैसर्गिक ओढा होता तो बंद झाला आहे.
त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी जाणार तरी कुठे ? नुकत्याच झालेल्या मुसळधार जोरदार पावसामुळे केसनंद परिसर व गावठाण हद्दीत पावसाचे पाणी घराघरात,दुकानामध्ये शिरले.याची संपूर्ण गावाला प्रचिती आली असून गावातील बऱ्याचशा सांडपाणी ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे आणि नैसर्गिक ओढे गायब झाल्यामुळे जनतेचे अतोनात नुकसान झाले आहे.
केसनंदचे तलाठी शुभम वाबळे यांनी झालेल्या नागरिकांच्या नुकसानीचे तातडीने सर्व पंचनामे करून तहसीलदार यांना पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर केला आहे.अनेक नागरिकांच्या घर आणि दुकानातील फ्रिज,टीव्ही,वॉशिंग मशीन,कपडे पाण्यामुळे खराब झाल्या असून अशा मौल्यवान वस्तूंच्या झालेल्या नुकसानीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहे.काहीही चूक नसताना नागरिकांना लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.या पुढील काळात हे नैसर्गिक ओढे,नाले खुले न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
केसनंद गावांमध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर प्लॉटिंग व बिल्डर व्यवसायिक झाले आहे.अनेक सोसायटीमध्ये सोसायटीमधील ड्रेनेज लाईनचे पाणी रस्त्यावर सोडण्यात आले असून मी अनेक तक्रारी केल्या आहेत परंतु महसुल विभाग गप्प दुर्लक्षित असून अनाधिकृत प्लाॅटिंग व बिल्डर व्यवसायिकांनी नैसर्गिक ओढे,नाले बिजवल्याने महसुल विभागाने पंचनामे करून संबंधित ओढे बुजवणारे अनाधिकृत प्लाॅटींग व बिल्डर व्यवसायीकांवर कारवाई करून फौजदारी दाखल करावेत.नैसर्गिक ओढे नाले पुन्हा पुर्ववत केले पाहिजे - चंद्रकांत वारघडे, संस्थापक-माहिती सेवा समिती
केसनंद परिसर व गावठाण परिसरात पावसामुळे ग्रामस्थांच्या घरात,दुकानामध्ये पाणी शिरल्याची आम्ही जाऊन पाहणी केली असता स्वतःपाणी काढून देण्यासाठी सिमेंट पाईप टाकले असून यापुढे दक्षता घेतली जाईल.तसेच घरात,दुकानात पाणी शिरून नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे - श्रीकांत पाटोळे, जिल्हा उपाध्यक्ष-राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार तथा अध्यक्ष-पोलिस मित्र संघ, केसनंद
000
Tags:
About The Author
Latest News
16 Jun 2025 17:48:53
सोलापूर - फुग्यांनी सजविलेल्या स्वागत कमानी…! बाळाचे पाय कलर मध्ये बुडवून पायाचे ठसे घेणेत दंग असलेल्या शिक्षिका…! शाळेत पहिले पाऊल...