- राज्य
- 'जाहीरपणे बोलताना भान ठेवणे आवश्यक'
'जाहीरपणे बोलताना भान ठेवणे आवश्यक'
मंत्री नितेश राणे यांना थोरल्या बंधूंचा वडीलकीचा सल्ला
मुंबई: प्रतिनिधी
आपल्या आक्रमक भाषा शैली साठी प्रसिद्ध असलेले नितेश राणे यांना त्यांचे थोरले बंधू निलेश राणे यांनी तबुरीचा सल्ला दिला आहे. जाहीर सभेत बोलणे सोपे असते. मात्र त्याचा परिणाम काय होतो, त्याचा फायदा फोन उठवतो, याचा विचार करून बोलताना भान राखणे गरजेचे आहे, काका खाल्ला निलेश यांनी नितेश राणे यांना दिला आहे.
नितेश राणे हे कडवे हिंदुत्व आणि तितकीच कठोर भाषाशैली यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आक्रमक विधानांमुळे अनेकदा त्यांनी वाद देखील उडवून घेतले आहेत. नुकतेच त्यांनी असे एक विधान केले आहे. 'देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांचा बाप बनून राज्यात मुख्यमंत्री पदावर बसले आहेत. देशात नरेंद्र मोदी हे एकच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हे एकच मुख्यमंत्री आहेत,' असे विधान नितेश राणे यांनी केले आहे.
त्यानंतर निलेश राणे यांनी आपल्या धाकट्या बंधूंना शबरीने बोलण्याचा चला दिला आहे. जाहीर सभेत बोलणे सोपे आहे. मात्र, आपल्या बोलण्याचा फायदा कोणाला होतो याचे भान ठेवणे आवश्यक आहे. आपण महायुतीत एकत्र आहोत, हे विसरून चालणार नाही, अशी जाणीव निलेश राणे यांनी नितेश राणे यांना समाज माध्यमाद्वारे करून दिली आहे.

सध्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असून त्यामुळे अनेक पक्षांचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून एकमेकांवर आगपाखड केली जात आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी नितेश राणे यांना दिलेला सल्ला अधिक मोलाचा ठरणार आहे.