खाजगी शाळेत प्रवेश घेऊन घरपट्टी, पाणी पट्टीची रक्कम मिळवा

खाजगी शाळेत प्रवेश घेऊन घरपट्टी, पाणी पट्टीची रक्कम मिळवा

जिल्ह्यातील पहिला निर्णय; वडगाव हवेली येथील डॉ. सुधीर जगताप व सचिन जगताप यांची सामाजिक बांधिलकी

कराड : वडगाव हवेली येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यामंदिर या खासगी अनुदानित शाळेत विद्यार्थी वाढण्यासाठी संस्थेचे संचालक डॉ. सुधीर जगताप व पद्मीनी उद्योग समुहाचे प्रमुख सचिन जगताप यांनी या खाजगी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घराची एका वर्षाची पाणीपट्टी व घरपट्टी भरण्याचा निर्णय घेतला आहे.

वाई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थ्यांचा पट वाढविण्यासाठी ग्रामपंचायत, सरपंच यांनी हा निर्णय घेतला होता. यांचा धर्तीवर एक सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ. सुधीर जगताप व सचिन जगताप यांनी सातारा जिल्ह्यातील खासगी शाळेत इयत्ता पहिलीमध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घराची एका वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचा घेतलेला निर्णय जिल्ह्यातील पहिला निर्णय आहे. एरवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पट वाढीसाठी अनेक गावांतील सरपंच यांनी हा निर्णय घेतला आहे. पण खाजगी प्राथमिक शाळेतील हा पहिला निर्णय ठरला आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकारी, माजी उपसरपंच राजेंद्र थोरात, जे. जे. जगताप, उत्तम जगताप, भास्कर जगताप, बाळासाहेब नांगरे, पतंगराव रक्ते माजी उपसरपंच संतोष जगताप, जयवंत जगताप सचिन जगताप, प्रताप जगताप, मुख्याध्यापक डी. पी. पवार व सर्व शिक्षक उपस्थित होते.

हे पण वाचा  वाजेगाव येथील भराव पूल वाहून गेल्याने कराड - चिपळूण मार्ग बंद

यावेळी बोलताना सचिन जगताप यांनी शाळेचा पट टिकवायचा असेल तर, अनेक मुद्दे मांडले. त्यामध्ये अध्यापनाचा दर्जा, बदलत्या काळातील शिक्षणपद्धती, शालेय सुविधा आदी मुद्दे उपस्थित केले. यावेळी प्रताप जगताप यांनी यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिली नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घराची घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचा निर्णय जाहीर केला.

पटसंख्या वाढवण्यासाठी शक्कल

ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थी संख्या घटू लागली आहे. यामुळे अनेक संस्था चालकही नवीन शक्कल लढवून आपल्या शाळेची पटसंख्या कसा वाढेल, हे पाहत आहेत. त्यानुसार आता खाजगी शाळेतही ही शक्कल लढवली जात असल्याचे दिसून येत आहे.

सामाजिक बांधिलकीचे जतन

ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शहराकडे पालकांचा ओढा वाढला आहे, तो थांबला पाहिजे. तरच ग्रामीण भागातील शाळा टिकतील. त्या टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. - डॉ. सुधीर जगताप (संचालक, यशवंत शिक्षण संस्था, सदाशिवगड)

000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
मेढा : पाचगणी पोलिस स्टेशनचे कार्यक्षम सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पाचगणी पोलिसांनी दाखल गुन्ह्यांमधील...
उपमुख्यमंत्र्याच्या गावकडे जाणारा तापोळा रस्ता गेला वाहून
६५ वर्षांच्या आजींचा रिक्षावर आत्मनिर्भरतेचा प्रवास!
अर्जुन कोळी यांची मिपा औरंगाबादच्या कोअर कमेटी सदस्यपदी निवड
‘टिळक’मध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना मोफत एस.टी. पासचे वितरण
खाजगी शाळेत प्रवेश घेऊन घरपट्टी, पाणी पट्टीची रक्कम मिळवा
डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advt