वडगावात रस्त्याचे काम सुरू;दै.राजदंड च्या बातमीची नगरपंचायत प्रशासनाकडून दखल

सुरू असलेल्या कामांची मुख्याधिकाऱ्याकडून पाहणी

वडगावात रस्त्याचे काम सुरू;दै.राजदंड च्या बातमीची नगरपंचायत प्रशासनाकडून दखल

वडगावात रस्त्याचे काम सुरू;दै.राजदंड च्या बातमीची दखल; नगरपंचायत प्रशासनान प्रशासन खडबडून जागे

वडगाव मावळ/सतिश गाडे 

वडगाव नगरपंचायत हद्दीतील गणपती मंदिर ते मोरया चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत गावठाण हद्दीतील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या वृत्ताने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.रस्त्याच्या दुरवस्थेबाबत दि.२१ जुलैला दै राजदंड ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन नगरपंचायत प्रशासनाने रस्त्याचे काम सुरू केले आहे. 

यावेळी सुरू असलेल्या कामांची नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम यांनी पाहणी केली रस्ते काँक्रिटीकरण कामांचा दर्जा राखण्याच्या सुचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या 

हे पण वाचा  'लघुउद्योग हा आत्मा कायम ठेऊनच धारावीचा पुनर्विकास'

वडगाव नगरपंचायत हद्दीतील गणेश मंदिर ते छत्रपती शिवाजी चौकापर्यंत रस्त्यावर असणारे खड्डे वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहरात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत मात्र या रस्त्याचे काम करण्यात नेमकं घोडं अडलं कुठं? असा संतप्त सवाल  स्थानिक नागरिक वाहन चालकांमधून उपस्थित होत होता.

या संदर्भात दै.राजदंड ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. रस्त्यांची दुरुस्ती ही दर्जेदार पद्धतीने करण्यात यावी, ही नागरिकांची अपेक्षाही त्यामध्ये नमूद करण्यात आली होती. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आठ दिवसांत रस्त्याच्या  कामाला सुरुवात झाली.

वडगाव शहरातील मुख्य रस्त्यानंतर शहरातील हा दुसरा प्रमुख रस्ता आहे. बंदिस्त जलनिरस्मरण वहिनीसाठी खोदकाम करण्यात आले त्यासाठी चांगल्या स्थितील रस्ता खोदण्यात आला होता या रस्त्यावरून प्रवास करताना शेतकरी, नागरिक, शाळेतील विद्यार्थीना जाण्यासाठी मोठी कसरत करून जावे लागत असून यामध्ये अनेक शेतकरी हे दूध व्यवसाय करीत असल्यामुळे अशा नागरिकांना दुधाच्या किटल्या घेऊन जाताना रोडवर चिखल असल्यामुळे त्यातून कशीबशी वाट काढत जावे लागत होते 

 दुचाकी चारचाकी चालकांना येथून जीव मुठीत धरून जावे लागते. कधी कधी वाहन वेगात असल्यास वाहनाचे देखील नुकसान होते, असे नागरिक सांगतात. अनेकदा रस्ते खोदल्याने पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाद होतात. स्थानिक पातळीवर हमरी तुमरीवर येण्याचे प्रकार होतात दरम्यान सामान्य प्रवाशांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास होत होता मात्र आता रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू झाल्याने नागरीकानी समाधान व्यक्त केले आहे.

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

Advt