अखेर सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांची यशस्वी घरवापासी

अमेरिकन सरकार आणि नासाच्या चिकाटीचे फळ

अखेर सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांची यशस्वी घरवापासी

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था 

एक आठवड्यासाठी अंतराळात गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या अंतराळवीरांची तब्बल नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर यशस्वी घरवापसी झाली आहे. अमेरिका सरकार आणि त्यांची अंतराळसंशोधन संस्था नासाच्या चिकाटीचे हे फलित असून त्यांच्या प्रयत्नांना स्पेस एक्सची मोलाची साथ लाभली. 

भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवारी पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी त्यांना घेऊन येणारे अंतराळ यान फ्लोरिडा येथे समुद्रात उतरले. त्यानंतर अंतराळवीरांना अत्यंत काळजीपूर्वक बोटीवर आणण्यात आले. दीर्घ प्रतीक्षेनंतर पृथ्वीवर आलेल्या अंतराळवीरांनी सुस्मित चेहेऱ्याने आणि हात हलवत आपल्या चाहत्यांना दिलासा दिला. 

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर हे एक आठवड्याच्या संशोधन मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रात रवाना झाले होते. त्यांच्या यानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा मुक्काम तब्बल नऊ महिन्यांपर्यंत वाढला. दरम्यानच्या काळात त्यांना परत आणण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले. मात्र, नासाने चिकाटी आणि खुद्द अंतराळवीरांनी धैर्य सोडले नाही.

हे पण वाचा  भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ

एकीकडे परतीचे प्रयत्न विफल असताना काही वेळा हे अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर येऊ शकणार का, असा काळीज चिरणारा सवाल निर्माण व्हावा, अशाही वेळा आल्या. मात्र, अंतराळवीरांनी स्वतःचे मनोबल तर कायम राखलेच पण, आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र हे माझे दुसरे घरंच असल्याचे सांगत चाहत्यांना धीर दिला. या सर्व प्रयत्नांना आज यश लाभले आहे. 

या अंतराळवीरांच्या यशस्वी पुनरागमनानंतर नासाच्या कार्यालयासह संपूर्ण अमेरिकेत आणि सुनीता विल्यम्सचे मूळ असलेल्या भारतातही मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

वळणाचे बळी! .. वळणाचे बळी! ..
मुंबई उपनगरीय रेल्वेचे अपघात नवीन नाहीत. हजारो प्रवाशांचा बळी जाऊनही रेल्वे प्रशासनाला शहाणपण सुचत नाही. पूर्वीचेच प्रयोग पुन्हा पुन्हा केले...
महत्त्वाकांक्षेचा चिराग!
रविवारच्या सुट्टीसाठी १३५ वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडेंना भारतरत्न मिळावा!
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी विद्यार्थी एल्गार परिषद मुंबईत!
यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी आवश्यक: डॉ भारतभूषण जोशी 
'देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या जनाधाराची राखावी बूज'
अनोखा अनुभव देणाऱ्या 'समसारा' चित्रपटाची उत्कंठा शिगेला

Advt