भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल

उपकर्णधार पदाची जबाबदारी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्यावर

भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल

मुंबई: प्रतिनिधी 

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी क्रिकेट संघाची निवड करण्यात आली असून त्याबद्दलची घोषणा भारत क्रिकेट नियमक मंडळाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. संघाच्या कर्णधार पदावर शुभमन गिल याची निवड करण्यात आली असून उपकर्णधार पदाची जबाबदारी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्यावर सोपविण्यात आली आहे. इंग्लंडच्या दौऱ्यात शुभमनच्या नेतृत्वगुणाचा कस लागणार आहे. 

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय कसोटी क्रिकेट संघात शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करूण नायर, नीतीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. 

भारताच्या संघात उपकरण धार ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल या दोन यष्टीरक्षकांचा समावेश आहे. भारताचा स्टार जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखण्यामुळे तीन महिने भारतीय संघाच्या बाहेर होता. आता तो तंदुरुस्त होऊन इंग्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या संघात सहभागी झाला आहे. जसप्रीत आणि मोहम्मद सिराज या दोघांवर भारतीय संघाकडून जलदगती गोलंदाजीची धुरा असणार आहे. त्यांच्याबरोबरच अर्षदीप सिंह, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर या गोलंदाजांचाही संघात समावेश आहे. मोहम्मद शमी याला संघातून वगळण्यात आले आहे. 

हे पण वाचा  'चीन, रशिया प्रमाणे नको त्या नेत्यांना गायब करता का?'

करुण नायर याची भारतीय क्रिकेट संघात तब्बल आठ वर्षानंतर घर वापसी झाली आहे. इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना सन 2016 मध्ये त्याने त्रिशतक झळकावले होते. त्यानंतर 2017 सालानंतर करुण प्रथमच भारतीय कसोटी क्रिकेट संघाकडून खेळणार आहे. या संघात साई सुदर्शन आणि अर्षदीप सिंह या खेळाडूंना प्रथमच भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अमराठी लोकांबद्दल द्वेष निर्माण करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व मनसेवर...
'सलीम जावेद च्या कहाण्या आता बंद करा'
'भ्रष्टाचारात पहिला नंबर पण नीतिमत्ता, विकासात सर्वात शेवटी'
'भारत काँग्रेस मुक्त करतानाच भाजप झाला काँग्रेस युक्त'
'कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्या प्रयत्नातून राज्य विकासाच्या मार्गावर'
महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढविणार
‘बिन लग्नाची गोष्ट’ - नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास

Advt