४५ प्रवासी तासगावला सुखरूप परतले!

अहमदाबाद विमानतळावरून परतीचा प्रवास; आ. रोहित पाटील यांनी केली मदत 

४५ प्रवासी तासगावला सुखरूप परतले!
तासगाव
 
गुरुवारी अहमदाबाद विमानतळ परिसरात झालेल्या विमान अपघातानंतर  संपूर्ण विमान व्यवस्था  कोलमडून गेली. दरम्यान तासगाव तालुक्यातील ४५ प्रवासी माउंट अबू, राजस्थान, साबरमती गुजरात या ठिकाणी  सहलीसाठी गेले होते. गुरुवारी दुपारी २ वाजता अहमदाबादहुन पुण्याला विमानाने येणार होते. दरम्यान दुपारीच अहमदाबाद- लंडन विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर विमानतळावरील सर्व  वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. विमानतळावरून  विमान उड्डाणे रद्द करण्यात आली.  तासगाव तालुक्यातील प्रवासी अहमदाबाद विमानतळावर  अडकून पडल्याची माहिती  नातेवाईकांनी  आ. रोहित पाटील यांना दिली. त्यानंतर आ. पाटील यांनी तासगाव येथील सर्व ४५ प्रवाशांना सुखरूप  तासगाव पर्यंत आणण्याची सोय केली.
 
 दरम्यान, तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित आर. आर. पाटील   यांना तासगाव मधील प्रवासी अहमदाबाद विमानतळावर अडकल्याची माहिती  मिळताच  त्यांनी थेट प्रवाशांशी संपर्क साधून  त्यांना दिलासा देत. त्यांना अहमदाबादहुन थेट तासगाव पर्यंत  सुखरूप आणण्याची व्यवस्था  केली.  
 
अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर धुराचे लोट व विमानतळावर झालेली  गडबड पाहून  तासगाव मधील प्रवासीही धास्तावले होते. सदर प्रवाशांना आ. रोहित पाटील यांनी दिलासा दिला व त्यांना सुखरूप तासगाव पर्यंत आणण्याची जबाबदारी घेतली.  केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ  यांच्याशी संपर्क करून गुरुवारी संध्याकाळी अहमदाबाद येथील विमानतळावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर  तासगाव येथील सर्व ४५ प्रवाशांना विमानाने पुण्यापर्यंत आणण्याची व्यवस्था केली गेली. तसेच  तासगाव मधील  सहलीसाठी गेलेले सर्व प्रवासी सुखरूप असून  ते शुक्रवारी सकाळी तासगाव मध्ये पोहोचतील. अशी माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली. 
 
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर तासगाव येथून सहलीसाठी गेलेल्या प्रवाशांना सुखरूप आणण्यासाठी  आ. रोहित पाटील यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल सर्व प्रवाशांनी  त्यांना धन्यवाद दिले.
 
 
आ. रोहित पाटील "तत्पर लोकप्रतिनिधी" असल्याचा पुन्हा एकदा प्रत्यय...
 
 काही दिवसापूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी येथील काहीजण कोकणात सहलीसाठी गेली होती. त्यावेळी त्यांच्यावर असाच अडचणीचा प्रसंग आला होता. तेव्हाही आमदार रोहित पाटील यांनी  कोकणातील लोकप्रतिनिधींशी संपर्क करून  कवठेमहांकाळ तालुक्यातील सहलीला गेलेल्या सर्व युवकांना एस.टी.ची सोय करून  सुखरूप पणे कवठेमहांकाळ येथे आणले होते. आजही अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर  अडचणीत सापडलेल्या तासगाव येथील प्रवाशांना  आमदार रोहित पाटील यांनी तितक्याच तत्परतेने  सुखरूप तासगाव पर्यंत आणण्यासाठी केलेली व्यवस्था  निश्चितच कौतुकास्पद आहे.  या दोन्ही प्रसंगातून  आ. रोहित पाटील  एक तत्पर लोकप्रतिनिधी असल्याचा प्रत्यय आला आहे.
 
000
Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt