पहेलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पहेलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

मुंबई: प्रतिनिधी 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांचे अर्थसहाय्य देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली जात आहे. 

या हल्ल्यात बळी पडलेले पुणेकर संतोष जगदाळे यांच्या मुलीला मुख्यमंत्र्यांचा विशेष अधिकार वापरून शासकीय नोकरी देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

हे पण वाचा  'हिंदी बनली मुंबईची बोलीभाषा, तीच आमची लाडकी बहीण'

डोंबिवली येथील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी तिघे मावस भाऊ कुटुंबियांसोबत काश्मीरला फिरायला गेले होते. त्यांना दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळ्या घातल्या. तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हो दोघे मित्रही त्यांच्या कुटुंबासह पहलगाम येथे गेले होते. त्यांनाही दहशतावाद्यांनी डोक्यात गोळी मारून ठार केलं. तर नवी मुंबईतील दिलीप देसले यांचाही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

About The Author

Advertisement

Latest News

ख्रिश्चन समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व द्या: पी विल्सन ख्रिश्चन समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व द्या: पी विल्सन
पुणे : प्रतिनिधी देशात ख्रिस्ती समाजावर दिवसागणिक अत्याचार वाढत आहेत. संविधानिक हक्काचा भंग काही जातीवादी शक्ती करीत आहेत. मणिपूरचा प्रसंग,...
नागालँडमधील सात आमदारांनी सोडली अजितदादांची साथ
रॅगिंग प्रकरणी तीन विद्यार्थी डॉक्टरांचे निलंबन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
'हिंदी बनली मुंबईची बोलीभाषा, तीच आमची लाडकी बहीण'
'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन'
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मुंबई युवक अध्यक्षपदी संतोष कदम!

Advt