'स्वतः कुणाची छेड काढणार नाही, दुसऱ्याने छेड काढली तर...'

भारतीय सैन्याचे अण्णा हजारे यांनी केले कौतुक

'स्वतः कुणाची छेड काढणार नाही, दुसऱ्याने छेड काढली तर...'

शिर्डी: प्रतिनिधी

भारत स्वतः कोणाची छेड काढणार नाही पण भारताची कुणी छेड काढली तर त्याला कधी सोडणार नाही, असे उद्गार काढत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. यापुढे भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याचे धाडस कोणी दाखवणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीर मधील नऊ ठिकाणांचे दहशतवादी तळ उध्वस्त करून घेतला आहे. भारताच्या या कारवाईचे देशभरात समर्थन केले जात आहे. 

लष्कराने एवढी उत्तम कारवाई केली आहे की त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. दहशतवाद्यांनी विनाकारण 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. त्यांना न्याय देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरची कारवाई केली आहे. त्यामुळे या कारवाईच्या विरोधात कोणी काही बोलू शकत नाही, असे अण्णा हजारे यांनी सांगितले. 

हे पण वाचा  देवाच्या नावावर लूटमार करणाऱ्यांना सोडणार नाही: फडणवीस

भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ९ ठिकाणी हल्ले करून तीन दशकांपासून सुरू असलेले दहशतवादी अड्डे उध्वस्त केले आहेत. त्यात शेकडो दहशतवादी यमसदनी गेल्याचा दावा करण्यात येत आहे. दहशतवादाच्या विरोधात सर्व देशांनी संघटित होऊन पावले उचलण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

पर्यावरणपूरक शाश्वत विकास ही काळाची गरज: अजित पवार पर्यावरणपूरक शाश्वत विकास ही काळाची गरज: अजित पवार
पुणे: प्रतिनिधीभारत देश आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, कारण आपल्या देशाचा विकासाचा वेग वाढला आहे, यामध्ये मोठ्या...
'पुणे, पिंपरी महापालिका निवडणुकीत जातीने लक्ष घालणार'
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांना काळे फासले
ऍड. उज्ज्वल निकम झाले राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार
'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पथनाट्य सादर करत केली स्वच्छताविषयक जनजागृती
स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ पत्रकारांनी जागविल्या जुन्या आठवणी

Advt