भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी...

पाकिस्तानबरोबर कथित कराराबाबत रशियाची स्पष्टोक्ती

भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी...

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना रशिया आणि पाकिस्तान यांच्यात व्यावसायिक करार झाल्याचे वृत्त केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरण रशियाकडून करण्यात आले आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्षाचे वातावरण असताना भारताचा घनिष्ठ मित्र असलेल्या रशियाने पाकिस्तान बरोबर तब्बल २.६ अब्ज डॉलरचा व्यावसायिक करार केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, हे वृत्त निराधार आणि खोडसाळपणाचे असून भारत आणि रशिया यांचे संबंध बिघडवण्यासाठी ते प्रसिद्ध करण्यात आले आहे, असा खुलासा रशियाकडून करण्यात आला आहे. वास्तविक ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक दृढ झाल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला. 

पाकिस्तान आणि सोविएत संघ यांच्यात सन १९७० मध्ये पाकिस्तान स्टील मिल्सच्या प्रकल्प उभारणीसंदर्भात करार झाला होता. त्याबाबत १३ मे रोजी रशिया आणि पाकिस्तानच्या उच्च अधिकार बैठकीत चर्चा झाली. मात्र, या संदर्भात कोणताही करार झालेला नाही, असे रशियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

हे पण वाचा  राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाने लावला चाप

About The Author

Advertisement

Latest News

ख्रिश्चन समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व द्या: पी विल्सन ख्रिश्चन समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व द्या: पी विल्सन
पुणे : प्रतिनिधी देशात ख्रिस्ती समाजावर दिवसागणिक अत्याचार वाढत आहेत. संविधानिक हक्काचा भंग काही जातीवादी शक्ती करीत आहेत. मणिपूरचा प्रसंग,...
नागालँडमधील सात आमदारांनी सोडली अजितदादांची साथ
रॅगिंग प्रकरणी तीन विद्यार्थी डॉक्टरांचे निलंबन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
'हिंदी बनली मुंबईची बोलीभाषा, तीच आमची लाडकी बहीण'
'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन'
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मुंबई युवक अध्यक्षपदी संतोष कदम!

Advt