- देश-विदेश
- भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी...
भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी...
पाकिस्तानबरोबर कथित कराराबाबत रशियाची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना रशिया आणि पाकिस्तान यांच्यात व्यावसायिक करार झाल्याचे वृत्त केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरण रशियाकडून करण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्षाचे वातावरण असताना भारताचा घनिष्ठ मित्र असलेल्या रशियाने पाकिस्तान बरोबर तब्बल २.६ अब्ज डॉलरचा व्यावसायिक करार केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, हे वृत्त निराधार आणि खोडसाळपणाचे असून भारत आणि रशिया यांचे संबंध बिघडवण्यासाठी ते प्रसिद्ध करण्यात आले आहे, असा खुलासा रशियाकडून करण्यात आला आहे. वास्तविक ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक दृढ झाल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला.
पाकिस्तान आणि सोविएत संघ यांच्यात सन १९७० मध्ये पाकिस्तान स्टील मिल्सच्या प्रकल्प उभारणीसंदर्भात करार झाला होता. त्याबाबत १३ मे रोजी रशिया आणि पाकिस्तानच्या उच्च अधिकार बैठकीत चर्चा झाली. मात्र, या संदर्भात कोणताही करार झालेला नाही, असे रशियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.