Baner, Balewadi | शाळेच्या समस्या बाबत केलेले बेमूदतउपोषण अखेर मागे

शेतकरी संघटणेचे उपोषण , मागण्या मान्य झाल्याचे लेखी दिल्याने मागे

Baner, Balewadi | शाळेच्या समस्या बाबत केलेले बेमूदतउपोषण अखेर मागे

बाणेर, बालेवाडी / रमेश जयस्वाल

बालेवाडी येथील शाळा क्रमांक 152 व 121 बाबूराव गेनूजी बालवडकर शाळेमध्ये अनेक समस्या होत्या •विद्यार्थाना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत होते •या बाबत अनेक वेळेस तक्रारी देऊनही पुणे महानगर

पालीका आणि शिक्षण विभाग या समस्या बाबत दखल घेत नव्हते• स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर यांनी बेमूदत उपोषण सुरू केले होते याची दखल शिक्षण विभागाच्या प्रमुख मीनाक्षी राऊत यांनी या उपोषण मंडपाला भेट देऊन शाळे संदर्भात तक्रारीची दखल घेत सर्व मागण्या मार्गी लावण्यात येईल असे लेखी उत्तर दिल्या नंतर उपोषण मागे घेण्यात आले•
         
या शाळे बाबत पालकांच्या अनेक तक्रारी होत्या वारंवार लेखी निवेदन देऊनही याची दखल शिक्षण विभाग आणि महानगर पालीका घेत नव्हती• या शाळेची पटसंख्या 1600 आहे असे असतांनाही प्रशासनाचे यावर दूर्लक्ष होते• पटसंख्या पाहता मुलांना बसायला  वर्ग कमी पडतात, पाणी वेळेवर आणि पुरेसे मिळत नाही, 
 
शाळला स्वच्छतेचा अभाव, स्वच्छता गृह अपुरे, मुलांची पटसंख्या पाहता शिक्षक कमी, शाळेला शिपाई कमी असल्याने मुलांना शाळेची साफसफाई करावी लागते तसेच खेळाचे मैदान नाही अशा अनेक समस्या या शाळेला आहे• या शाळेसमोरील गेट जवळ दरवेळी कचरा साचलेला असतो यावर प्रशासन दुर्लक्ष करत आहे• यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी या विषयी शिक्षण विभाग तसेच आयुक्त मनपा यांना निवेदन दिले होते परंतू यावर काहीच उपाय योजना न झाल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला या उपोषणाला शाळेचे विद्यार्थी त्यांचे पालक सुध्दा सहभागी झाले होते• या भागातील सर्व पक्ष, प्रतिष्ठीत नागरिक यांनी या उपोषणाला पाठींबा दर्शविला होता• शेवटी प्रशासनाने याची दखल घेतल्याने उपोषण सोडण्यात आले• प्रत्यक्षात अनेक वर्षा पासून विद्यार्थ्याना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत होते परंतू यावर प्रशासनाचे दुर्लक्ष आणि स्थानिक लोकप्रतीनिधी यांचे यावर लक्ष नसल्याने उपोषणाचा मार्ग ईतरांना अवलंबवावा लागतो • ही बाब
निदंनिय आहे• या शाळेत गरीबांचे मुले शिक्षण घेतात उच्चभू शिक्षण घेणारे यावर लक्ष काय देतील शेवटी प्रकाश बालवडकर यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला जागे केले•
 
000
Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'दहशतवादविरोधी लढ्यात भारताकडून जगाला खूप अपेक्षा' 'दहशतवादविरोधी लढ्यात भारताकडून जगाला खूप अपेक्षा'
मुंबई: प्रतिनिधी  दहशतवादाचे मोठे संकट जगासमोर असून त्याच्या विरोधातील लढ्यात जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असे 'ऑपरेशन सिंदूर' राबविण्यामागील भारताची...
सस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' 13 जूनला होणार प्रदर्शित
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण मोहीम
भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ
'राज ठाकरेंची इच्छा ती माझी इच्छा, पुढाकार कोणीही घ्यावा'
शशांक हगवणे याची भामटेगिरी उघड
कॅल्शियमची कमतरता पूर्ण करणारा आयुर्वेदिक सिध्द कॅल्सी योग !

Advt